मुंबई : मोदी सरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. हे आता रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने काहीच केले नाही. मोदी सरकार आल्यानंतर रोजंदारी करणाऱ्यांसाठी व बेरोजगारांसाठी एक वाईट काळ सुरू झाला आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर रोजंदारी करणाऱ्या व बेरोजगारांसाठी एक वाईट काळ सुरू झाला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्व्हे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही, असा आरोपही महेश तपासे यांनी केला.
“मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
पंतप्रधान मोदींनी नोटबंदी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. शिवाय कोरोना काळात अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकर्यांना मुकावे लागले होते. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्जे माफ करून मोदी सरकारने ते भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले, असंही तपासे म्हणाले.
“शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
राजकीय लालसापोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण तर स्वीकारले जात नाही ना, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी ‘बुलेट ट्रेन’ चा निर्णय तत्परतेने घेतात, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाही. एकीकडे न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर ‘सी वोटर’ चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्व्हे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे. कमी बॉलवर जास्त रन काढण्याच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली आहे. त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेले शिंदे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही, असेही महेश तपासे म्हणाले.
Read also
- “राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला
- काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान
- “शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध
- “प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल
- “आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”