मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी काही दिवसांपासुन भेटीगाठी वाढल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विनोद तावडे या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. सोबतच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांची आणि राज ठाकरे यांची भेट होणार असल्याची चर्चा सरू आहे. या भेटीत भाजप-मनसे युतीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीत घरी जायला हरकत नाहीत. भेटीसाठी जावं. मात्र राजकीय युती करू नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.
“मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
राज ठाकरे चांगेले नेते आहेत. सभा होतात पण मतं मिळत नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपने सोबत घ्यावं हे माझं मत नाही. भाजप-मनसे युती झाली तर भाजपला त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त सहन करावं लागेल. मुंबईतील मराठी माणसांसाठी राज ठाकरेंना भाजप जवळ करत असेल तर देशपातळीवर भाजपाला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा रिपाइ अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.
“शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
राज ठाकरे यांना भाजपने सोबत घेतलं तर त्यांना उत्तर भारतीय, साउथ इंडियन मतं मिळणार नाहीत. मनसेला सोबत घेतलं तर देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्वाची आहे. पण मुंबईतल्या इतर लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारं नाही. मनसेला स्वातंत्र्य पणे लढू द्यावं. तो स्वतंत्र्या पक्ष आहे. दलित समाजातही गैगसमज होऊ शकतो. मी भाजप सोबत आहे, असं आठवले म्हणाले.
“मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला
सोबतच, काँग्रेस क्षीण झाली आहे. काँग्रेस रसातळाला गेलीय. आता काँग्रेसमध्ये काहीही उरलेलं नाही. काही दिवसांआधी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला. तसं तुम्हीही पक्ष सोडा. अशोक चव्हाण यांना माझं आव्हान आहे. आपण अत्यंत हुशार राजकारणी आहात. शंकरराव चव्हाण यांचे आपण चिरंजीव आहात. मराठवाड्याच्या विकासासाठी असा निर्णय अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना दिला आहे.
Read also
- काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान
- “शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध
- “प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल
- “आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”
- ”भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत