गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. आतापर्यंत देशभरात रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९७६५ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ४७७ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा वाढता फैलाव कमी करण्यासाठी देशभरात विविध योजना राबवल्या जात आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे आणि जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत आणि त्यादृष्टीने जनजागृती करत आहेत.
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्याला रोखण्यासाठी राजू शेट्टी मैदानात!
याच दरम्यान सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच त्यांनी रोगापासून संरक्षण होण्यासाठी लोकांना अजब गजब सल्ला दिला आहे. सध्या ठाकूर यांच्या विधानाचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
टंट्या मामाचं ताबीज आपलं संरक्षण करेल. कोरोना काळात लाखोंची गर्दी एकत्र आली तरी मामाचं ताबीज असल्यामुळे कोणालाही काहीही झालेलं नाही आणि होणारंही नाही. कोणताही आजार असेल तर तो देखील बरा होईल असं विधान आता उषा ठाकूर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, परमबीर यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा..
मध्यप्रदेशमध्ये टंट्या मामा भिल यांचा बलिदान दिवस दरवर्षी ४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. आदिवासी समाजातील लाखो बांधव यावेळी एकत्र येत असतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी आस्थेचं स्थान असलेल्या या उत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू नयेयासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. याच याच दरम्यान उषा ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
यापूर्वी देखील ठाकूर यांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी “मी हनुमान चालीसाचेपठण करते. मी रोज शंख फुंकते. काढा पिते. शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.यामुळे माझा कोरोनापासून बचाव होतो असं देखील ठाकूर एकदा म्हटल्या होत्या.
Read Also :
- ‘…तरच आघाडी करू’; वैभववाडी नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेना, काँग्रेसला इशारा
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी; मात्र एकनाथ खडसे की रोहिणी खडसे?
- कारवाईचा बडगा: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करणार; अनिल परबांचा इशारा
- चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब – नवाब मलिक
- चिंता वाढली: दक्षिण अफ्रिकेतून मुंबई विमानतळावर आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह