अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून शिर्डीत त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. त्यांचं विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी शिर्डी मंदिरात जाऊन साईबाबाचं दर्शन घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…श्रेयवादाची लढाई सुरू..! “मोदीजी आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे”, राष्ट्रवादीने मोदींना लगावला खोचक टोला
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साईनगरित जवळपास ७५०० कोटी रूपयांच्या विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. यातच आता निळवंडे प्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतांना गालबोठ लागू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, वाहनांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंची मागणी”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ तर घेतली पण आरक्षण मिळवण्याचे मार्ग काय आहेत ते जरांगे पाटील यांना समजवून सांगावे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत. त्यांनीही मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले, गावात सुरू केलं ठिय्या आंदोलन
हेही वाचा…नरेंद्र मोदी साईनगरीत दाखल, तब्बल ७५०० कोटी रूपयांच्या विकास कामांचं होणार लोकार्पण
हेही वाचा…“हिंमत असेल तर मनोज जरांगे पाटलांना अटक करून दाखवा,” मराठा समाज आक्रमक, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करणारा मंगेश साबळे कोण? अशी अनेक आंदोलने करण्यासाठी आहे प्रसिद्ध
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..