मुंबई : रत्नागिरीत राज्यातल्या नवीन ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला असून, मृत ८० वर्षांची महिला संगमेश्वरमधील रहिवासी होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती आज प्रसार माध्यमांना दिली. दरम्यान, यानंतर तातडीने राज्यात या नवीन ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचा धोका वाढत असल्यामुळे, पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, याबाबत राज्य सरकारने आज नवीन नियमावली किंवा शासन आदेश काढला आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत, सर्वानुमते संमती देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत.
राज्यातील शाळा-कॉलेज कधी उघडणार? गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!
डेल्टा प्लसची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता होती. या नवीन ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे राज्यात आत्तापर्यंत एकूण २१ रुग्ण आढळले असून, यातील एका ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, हे बदल करण्यात आले आहेत. यानुसार आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
Levels of restrictions for safe Maharashtra pic.twitter.com/FOAKTSrI9A
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 25, 2021
दरम्यान, डेल्टा व्हेरियंट संदर्भात सध्या, राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून नमुने घेण्याचे काम सुरू असून, केंद्रीय संस्था NCDC यात राज्य सरकारला आवाहस्यक ती सर्व मदत तातडीने करत आहे. सध्यातरी राज्यातील ७ जिल्ह्यांत महामारीच्या या नवीन ‘डेल्टा प्लस’ प्रकारातील २१ रुग्ण असून, आत्तापर्यंत ३ हजार ४०० नमुन्यांपैकी २१ केसेसमध्येच ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे, हे प्रमाण राज्यात ०.००५ % आहे. हा काळजी करण्यासारखा विषय नसला, तरी त्याचे गुणधर्म गंभीर आहेत. त्यामुळे राज्यसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे,” असं टोपे यांनी सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे आदेशात?…
- तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० % क्षमतेने सं. ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी.
- विकेंड दिवशी हॉटेल बंद राहणार. (होम डिलिव्हरीला परवानगी)
- आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती सोडून, तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत.
- निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन निर्णय घेऊ शकतं.
- अत्यावश्यक दुकानं आणि आस्थापना सर्व दिवशी दु.४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी.
- इतर दुकानं आणि आस्थापनं सोम.-शुक्र. ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी.
- आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
- मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे याठिकाणी महामारीच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.
- ‘टेस्टिंग-ट्रॅकिंग-ट्रिटमेंट’ या पद्धतीला चालना.
- कामाच्या ठिकाणी हेपा फिल्टर्स आणि एक्झॉस्ट फॅनचा वापर आवश्यक.
- मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी.
- कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी कर्णयचे आदेश.
- गर्दी, सभा-कार्यक्रम, मेळावे घेण्याचं टाळावं.
- कन्टेन्मेंट झोन तयार करा.
- लग्नसमारंभ, रेस्टॉरंट, मॉल्ससारख्या गर्दीच्या ठिकाणी भरारी पथकं नेमून तपासणी आणि सक्तीनं नियमांचं पालन नागरिकांना करायला लावण्यास परवानगी.
- कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे
Read Also :
- भाजपच्या बड्या माजी केंद्रीय मंत्र्याने साधले टायमिंग, केला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका १९ जुलै रोजीच होणार!
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी
- भाजपच्या नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार
- केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं, जयंत पाटलांचा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर आरोप