पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आज महामारीच्या साप्ताहिक आढावा बैठकीसाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली आहे. यात, महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बाधित रुग्णांच्या आकडेवारीत घट होत असली तरी, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन, येत्या काळात सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
भाजपच्या नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार
तसेच, राज्यातील शाळा आणि महाविद्यालये १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात, ठाकरे सरकारकडून घेण्यात आला असून, १५ जुलै नंतरचे धोरण उपमुख्यमंत्री जाहीर करतील. राज्यातल्या लसीकरण मोहिमेला आता चांगली गती मिळाली असून, लस उपलब्ध होण्याचं प्रमाण वाढत आहे. तरीही डेल्टा प्लस व्हायरस आणि संभाव्य तिसरी लाट, यांचा धोका नको, म्हणून काही निर्बंध कायम राहतील. विशेषतः या नवीन लाटेत लहान मुलांना असणारा धोका ओळखून, शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं, जयंत पाटलांचा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर आरोप
“पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्यानंतर एकीकडे, दिलासा मिळाला असला, तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे, असं चित्र दिलासा दिल्या गेलेल्या जिल्ह्यांत दिसून येत आहे. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. असंच सुरु राहिलं, तर ते तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिल्यासारखं ठरेल. शासनाने दिलेली प्रवासाची मुभा ही फक्त आवश्यक कामांसाठी आहे. याचा अर्थ सर्वांनी बाहेर पडून गर्दी करा, असा नाहीये,” असं स्पष्ट सान्गतत्यानी नागरिकांना जबाबदारीने वागायचं आवाहन केलं आहे.
मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी
दरम्यान, “जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा द्यायचा, सरकारचा विचार आहे. लसीकरण आणखीन वाढवलं पाहिजे. सुपर स्प्रेडर लोकांना अटकाव करावा लागेल. केंद्र सरकार नक्कीच याबाबत मार्गदर्शन करत आहे. मात्र, नागरिकांनी स्वतःहून मोठ्या प्रमाणात गर्दी करणं टाळलं पाहिजे. खासकरून लग्नात वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. आम्ही याबाबत पोलिसांना कडक सूचना दिल्या आहेत,” अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
Read Also :
- भाजपच्या बड्या माजी केंद्रीय मंत्र्याने साधले टायमिंग, केला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा; ५० दिवसांच्या शहराध्यक्षपदाच्या प्रवासातील जगतापांच्या भावना
- ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका १९ जुलै रोजीच होणार!
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी
- भाजपविरोधी आघाडीवर संजय राऊत म्हणतात, “शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज…”