मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने, ओबीसी समाजाचं, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, ओबीसी आरक्षणाला घेऊन सध्या राज्यात प्रचंड गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्षाने देखील या मुद्द्यावरून सरकारला घेरलं असून, २६ जूनला चक्का जाम आंदोलनाची घोषणा विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे, तर सरकारमधल्या ओबीसी नेत्यांकडून देखील आक्रोश आंदोलनाची हाक दिली गेली आहे.
मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं; महापौरांच सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
यातच आता, निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला असून, त्यामुळे हा वाद अजूनच चिघळला गेला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, यांनतर या निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्य सरकारने, मुख्य सचिवांमार्फत निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली होती.
ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरात जोरदार निदर्शने, धरपकड सुरु
यावर आता, निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांत राज्य सरकारला उत्तर दिले असून, “या पोटनिवडणूका खुल्या प्रवर्गातून १९ जुलै रोजीच होतील,” असे उत्तर राज्याचे निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी आज राज्य शासनाला दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक थांबवण्याच्या, राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या पत्रात लिहिले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, आम्हाला ही पोटनिवडणूक मागे घेणे शक्य नाही. आम्ही लेव्हल १ च्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेत आहोत.” त्यामुळे, आता राज्य शासनाने आयोगाच्या भूमिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तरच काही होऊ शकेल.
अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, महामारीचा फैलाव राज्यात वाढत असल्याने आणि तिसऱ्या लाटेची भीती असल्याने, या निवडणूका पुढे ढकण्यात याव्यात, कारण प्रचाराच्या काळात लोकांची गर्दी अवधून प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भूमिका राज्य शासनाने पत्रात मांडली होती. मात्र, ओबीसींची नाराजी टाळण्यासाठी शासनाने हे कारण पुढे केल्याची चर्चा होती.
Read Also :
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी
- भाजपच्या नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार
- केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं, जयंत पाटलांचा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर आरोप
- भाजपविरोधी आघाडीवर संजय राऊत म्हणतात, “शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज…”
- मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी