मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकराने नीति आयोगावर सोपविली आहे. त्यानुसार या भागाचे जीडीपी तीन हजार कोटी डॉलर नेण्यासंदर्भाती आराखडा नीति आयोग तयार करणार असून त्यांना राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक पथ साह्य करणार आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीने आंदोलनचा पवित्रा हाती घेतलाय.
हेही वाचा…“विश्वगुरू अन् भाजप-आरएसएसच्या गुंडांनी प्रश्नांची उत्तरं द्या,” प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर संताप
महाराष्ट्राची राजधानी असलेला मुंबईबाबत थेट धोरण ठरवण्याची केंद्र सरकारची हिम्मत होतेय ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. सत्तेचा बोळा कानात असल्याने हा धोका राज्यातील सत्ताधाऱ्यांना ऐकू येत नाहीये. फडणवीस सरकारचा कणा केंद्र सरकारपुढे वाकला होता, मिंधे सरकारचा कणा अगदी मोडून पडला आहे. असा घणाघात राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर केलाय.
हेही वाचा…“राज्यातील महसुल अधिकारीच सुरक्षित नाहीत? ऑफिसमधील छत कोसळलं,” वडेट्टीवारांचा सरकारवर संताप
दरम्यान, नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करायचा असे भासवून शहराचे स्वतंत्र अस्तित्व संपवण्यासाठीचा घाट घातला जात असून जर कोणी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यासाठी आज मुंबई महाराष्ट्रात राहावी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आम्ही सरकारविरोधी आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, जितेन्द्रजी आव्हाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राची राजधानी असलेला मुंबईबाबत थेट धोरण ठरवण्याची केंद्र सरकारची हिम्मत होतेय ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. सत्तेचा बोळा कानात असल्याने हा धोका राज्यातील सत्ताधाऱ्यांना ऐकू येत नाहीये. फडणवीस सरकारचा कणा केंद्र सरकारपुढे वाकला होता, मिंधे सरकारचा कणा अगदी मोडून पडला आहे.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) August 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…विविध नेत्यांच्या नियुक्त्या तर अनेकांचा पक्षप्रवेश..! शरद पवार गटात मोठ्या राजकीय हालचाली सुरूय
हेही वाचा…“भित्रट नसाल तर लावा निवडणुका”, ठाकरेंच्या वाघांनी भाजपला दिलं ओपन चॅलेंज
हेही वाचा…इंडियाच्या नेत्यांना बसण्यासाठी ४५ हजारांची खूर्ची, ६५ खोल्या बुक, कोट्यावधीचा खर्च, सगळे पक्ष बेरोजगार होणार
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शरद पवारांचा खंदा समर्थकानी घेतली मोठी भूमिका, निवडणुकीपुर्वी कोणत्या गटात जाणार ?