मुंबई : मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे केंद्रीय यंत्रणांच्या पाठीमागे हात धरून लागले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून माजी खासदार किरीट सोमैया हे दिवसेंदिवस महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात घोटाळ्यांची मालिका उकरून काढत आहेत.
मार्च एप्रिलमध्ये भाजप-शिवसेनेचे राज्यात सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
दुसऱ्या बाजूने नवाब मलिक रोजच्या रोज एका मागून एक पुरावे ट्विटरच्या माध्यमातून उकरून काढत आहेत आणि जनतेसमोर मांडत आहेत. आज ठाकरे सरकारला येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबदल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचे आभार मानणारे पत्र सकाळीच प्रकाशित केले होते.
भाजपला मोठं खिंडार; भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरचं घरवापसी होणार…
त्यानंतर आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील कोणताही गौफ्यस्पोट न करत आज जनतेचे आभार मानले आहेत. गेल्या महिन्यांपासूनच आजचा दिवस असा असेल की नवाब मलिक यांनी कोणताही पुरावा ट्विटरवर टाकलेला नाही. भाजपाला पत्रकार परिषद घेण्यावाचून पर्याय नाही.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजूनही वाटत आहे, की आपणच मुख्यमंत्री आहोत. भाजपच्या आयटी सेल चुकीच्या गोष्टी व्हायरल करत आहेत. मात्र आम्ही त्यांना चारी मुंड्या चीत करू, अस वक्तव्य नवाब मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं आहे.
एसटी आंदोलन पेटले; शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, बसचालक जखमी
ते म्हणाले, की प्रत्येक नागरिकाला असे वाटले पाहिजे, की सरकार आमच्यासाठी काही करत आहे. कोविडकाळात सुरक्षा देण्याचे काम सरकारने केले. १५४६ कोटी तरतूद तसेच खर्च कोविड संरक्षणार्थ दिले. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना, विमा आदी सुरक्षा पुरविण्याचे काम केले. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सहाय्य केले, त्यामुळे आगामी काळातही ठाकरे सरकार दमदार कामगिरी करेल अशी अशा मलिक यांनी व्यक्त केली आहे.
नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल; प्रविण दरेकरांचा टोला
देशभरात खोट्या बातम्या पेरून इतर पक्षांना, विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करूनही २ वर्षात सरकार पाडता आले नाही. मात्र बातें कम, काम ज्यादा, असे सरकारचे धोरण असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काम उत्तम सुरू असल्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत.
Read Also :
- महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी सरकार खंबीर; मुख्यमंत्र्यांनी जनतेला लिहलं खास पत्र
- संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई; राज्यात ९३७ बसेस धावल्या रस्त्यावर
- ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रम : ‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती
- राज्यात पुन्हा निर्बंध लागू, सरकारची नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर…
- ‘त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला