मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन काल अचानकपणे चिघळलं. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. एसटी कर्मचाऱ्यांनी चिथवण्याप्रकरणी अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं. त्यांनतर त्यांच्यावर आज न्यायालयात सुनावणी झाली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीत आता 13 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
..तर पक्षांवर देखील कारवाई होईल; विक्रांत प्रकरणावरून सरकारी वकिलांनी दिला इशारा
न्यायालयात सदावर्ते यांच्या बाजूने वकिल गिरीश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला . शरद पवारांच्या घराचं कोणतंही नुकसान झालं नाही. त्याठिकाणी फक्त चप्पल फेक झाली. यात कुणालाही इजा झाली नाही,असा युक्तिवाद करण्यात आला. पैसे गोळा केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली नाही. तर न्यायालयात त्याचा उल्लेख का. हल्ला होणार हे पोलिसांना माहिती असूनही पोलीस का नव्हते ? असा सवाल देखील त्यांनी न्यायालयात उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला; संजय राठोड
आंदोलनकांचं तिथे धक्काबुक्की झाली होती.त्यावेळी स्कॉटलॅंड दर्जाचे पोलीस गाफिल का राहिले होते. ? या आंदोलनात फक्त एसटी कर्मचारी होते. मग या आंदोलनाला हल्ला म्हणता येणार नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना कुणालाही इजा पोहचण्याचा उद्देश नव्हता. कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत कर्मचारी बेशुद्ध झाले होते. चंद्रकांत सुर्यवंशी या न्युज चॅनेलच्या पत्रकारचा काय संबंध होता? असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
“साहेबांनी सांगितलं की, उद्या तु सभेला ये, भेटीनंतर मी समाधानी”; वसंत मोरे
दरम्यान, सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी या प्रकरणात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी या प्रकरणात सचिदानंद पुरी यांंचा समावेश केला आहे. न्यायालयात तो फेसबुक लाईव्ह केल्यानं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच नागपुरमधुन कोणत्या व्यक्तीचा फोन आला हे आम्हाला माहिती आहे. त्या व्यक्तीचं नाव उघड सांगू शकत नाही. परंतु कोर्टोला त्या व्यक्तीची माहीती दिली . असा युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला.
Read also:
- सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांच्या मनात विष कालवलं, त्यामुळे अनेकांनी जीवन संपवलं; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
- “सदावर्ते काॅलेजला सलग 4 वेळा नापास”; वैद्यकीय महाविद्यालयाने लावला होता ‘Debar rule’
- राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत; रामदास आठवलेंचं वक्तव्य
- “सोमय्या पळणारा नेता नाही, पळवणारा नेता आहे”; प्रवीण दरेकांचा आघाडीवर निशाणा
- “मनसेला जवळ केल्यास फटका बसू शकतो, याचा अंदाज भाजपला आला असेल”; जयंत पाटलांचा टोला