मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: वाशीत येऊन सरकारचा नवीन जीआर जरांगे पाटलांच्या हाती सोपविला. तसेच एकनाथ शिंदे यांनी ज्युस पाजून जरांगे पाटलांचं उपोषण देखील सोडवलं आहे. यानंतर संपुर्ण राज्यात मराठा समाजाकडून एकच जल्लोष करण्यात येत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली पहिली प्रतिक्रिया देत मराठा समाजाचं अभिनंदन केले आहे.
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
महायुती सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत अध्यादेश जारी केला आहे. आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समाजाच्या ऐक्याचा हा विजय आहे. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची भूमिका सकारात्मक राहिली आहे. २०१४ ते आजपर्यंत मराठा आरक्षम कायद्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसने हिरीरीनं समर्थन केले आहे. आज मराठा समाजाच्या संघर्षाला यश असून या संघर्षशील तमाम मराठा समाजाचे मनपुर्वक अभिनंदन. असे अजित पवार गटाने म्हटले आहे.
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याचा नवीन जीआर काढून जरांगे पाटलांच्या हाती दिला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना गुलाल लावून विजयाचा गुलाल देखील आज वाशीत उथळला. त्यामुळे मराठा समाजाकडून यांचं जोरदार स्वागत आणि मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला.
जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर कूच करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यानंतर राज्य सरकारची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. या बैठकीत जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशीत येऊन सरकारचा नवीन जीआर जरांगे पाटलांच्या हाती दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना ज्युस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं.
READ ALSO :
हेही वाचा…“हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पुर्ण करणारा शेतकरी पुत्र,” मुख्यमंत्री काय काय म्हणाले ?
हेही वाचा…“तर गावाकडे राहिलेले सर्वच मराठे झाडून मुंबईत येतील”, जरांगे पाटलांनी दिला सरकारला इशारा
हेही वाचा…“प्रचंड गर्दी, डोक्यावर आग ओकणारा सुर्य”, जरांगे पाटलांकडे सरकारचा जीआर घेऊन आलेल्या मंगेश चिवटे खाली कोसळले
हेही वाचा…जरांगे पाटलांनी आपला मुक्काम वाशीत वाढवला, जरांगे पाटलांच्या सरकारकडून कोणत्या मागण्या मान्य झाल्या ?
हेही वाचा‘मराठा वादळ’ जरांगे पाटलांनी वाशीतच रोखला, पण सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा