मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांसोबत आलेला लाखोंचा मराठा जनसमुदाय वाशीत थांबला आहे. सरकारने जरांगे पाटलांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु अद्यापही अजून काही मागण्या मान्य केल्या नाहीत. यासाठी जरांगे पाटलांनी आज रात्रीची वेळ दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास उद्या आझाद मैदानावर धडकणार असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच जर सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास गावाकडे राहिलेले मराठेही झाडून मुंबईत येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मुंबईत काही झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार”, विरोधकांनी सरकारला दिला कडक इशारा
आम्हाला आरक्षण मिळो वा न मिळो आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत. सध्या मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहेत. आता आम्ही आणखी वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा सन्मान करून आणखी वेळ वाढवून दिला आहे. असा संदेश आमच्या समाजामध्ये जाणार आहे. मात्र आता सरकारने काही दगाफटका केला, तर आहेत ते मराठे देखील झाडून मुंबईकडे येतील. तयामुळे आता सरकारला आरक्षण द्यावंच लागणार आहे. असेही जरांगे पाटलांनी सांगितलं.
हेही वाचा…“तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार माजेल,” मराठा आरक्षणाबाबत कुणी दिला मोठा इशारा?
दरम्यान, अंतरवाली सराटीत राज्यातील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली असून त्यासोबत त्यांसदर्भात पत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केलीय. तर सामान्य प्रशासन विभागाकडून सुमंत भांगे यांच्याशी चर्चा करून सरकारकडून कोण कोणते निर्णय घेतले. त्याची माहिती करून घेतली. यातच राज्यात सापडलेल्यांना ५४ लाख नोदीं असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यातच आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. परंतु सरकारकडून याचा डेटा जरांगे पाटलांनी मागितला आहे.
यातच कुणबी नोंदी सापडलेल्या नोंदींची माहिती ग्रामपंचायतीमध्ये लावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर शिबीरू सुरू असल्याची माहिती सरकारने दिलीय. तसेच ४५ लाख जणांना प्रमाणपत्र देऊन एका नोंदीत ५० ते १५० जणांना त्याचा लाभ होईल अन् त्यातून दोन ते अडीच कोटी समाज आरक्षणात येईल असेही जरांगे पाटलांनी सांगितले. तसेच इतरांना नोंदी शोधण्यासाठी मदत करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली असून नोंद मिलाल्यास सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीय .
READ ALSO :
हेही वाचा…“प्रचंड गर्दी, डोक्यावर आग ओकणारा सुर्य”, जरांगे पाटलांकडे सरकारचा जीआर घेऊन आलेल्या मंगेश चिवटे खाली कोसळले
हेही वाचा…जरांगे पाटलांनी आपला मुक्काम वाशीत वाढवला, जरांगे पाटलांच्या सरकारकडून कोणत्या मागण्या मान्य झाल्या ?
हेही वाचा‘मराठा वादळ’ जरांगे पाटलांनी वाशीतच रोखला, पण सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया