मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जरांगे पाटलांनी आपला ताफा वाशीतच रोखला आहे. मुंबईत येण्याआधी सरकारने नवीन जीआर काढत जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आजची रात्र वाशीत काढणार असून बाकी मागण्यांवर उद्या अध्यादेश काढला नाही तर मुंबईतील आझाद मैदानावर येऊन धडकणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळातून आलेल्या मंगेश चिवटे यांना भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार माजेल,” मराठा आरक्षणाबाबत कुणी दिला मोठा इशारा?
लोणावळ्यातून पायी चालून मराठा वादळ वाशीत येऊन धडकला. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर येण्याच्या आधीच सरकारचं शिष्टमंडळाने पुन्हा जरांगे पाटलांची भेट घेतली. तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकारने नवीन जीआर घेऊन जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेल्या मंगेश चिवटे यांना भोवळ येऊन ते कोसळले. प्रचंड गर्दी, डोक्यावर आग ओकणारा सुर्य यामुळे चिवटे यांना भोवळ आली. चिवटे यांची प्रकृती आता कशी आहे. याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पंरतु त्यांना तातडीने तेथून हलवण्यात आले.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य..! मुंबईत पोहचण्याआधीच आंदोलक माघारी घेणार ?
दरम्यान, सरकारने काढलेल्या नवीन जीआर मध्ये जरांगे पाटलांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. तसेच यावेळी अजून काही मागण्या जरांगे पाटलांनी सरकारकडे केल्या असून उद्यापर्यंत वेळ दिला आहे. नाहीतर आझाद मैदानावर आम्ही कूच करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटलांनी आपला मुक्काम वाशीत वाढवला, जरांगे पाटलांच्या सरकारकडून कोणत्या मागण्या मान्य झाल्या ?
हेही वाचा‘मराठा वादळ’ जरांगे पाटलांनी वाशीतच रोखला, पण सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मुंबईत काही झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार”, विरोधकांनी सरकारला दिला कडक इशारा