मुंबई : एकनाथ खडसे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद जग विख्यात आहे. दोन्ही नेत्यामधील सध्या शितयुध्द चालू आहे. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी डिवचले आहे. सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी टिका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर केली आहे.
एकनाथ खडसे यांनी आज (७ जून) पत्रकारांशी बोलताना टिका केली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा खोडसर चिमटा खडसे यांनी घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगत आहेत. सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
Read Also :
- नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; खडसेच्या टिकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
- मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटणार
- .‘कोविडला निमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती
- “संभाजीराजे आता आमच्याच मागं येताय ना?”, मराठा आंदोलनाच्या घोषणेनंतर मेटेंची टीका