मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रस्ता सोपा होईल, असं असतांना आता शिंदे-फडणवीसांच्या महायुतीत आलबेल नसल्याचं आता दिसत आहे. कारण मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
हेही वाचा…“अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन”, सामनातून अजित पवारांवर भाष्य
सत्तासंघर्षाचा निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित होता. परंतु त्याला अजूनही मुहर्त लागलेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांऐवजी आता शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना बाजूला करण्याबद्दल भाजप श्रेष्ठींनी आदेश दिल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यातच या महिन्यातच भाजप-शिवसेना युतीत कल्याण, ठाण्याच्या जागांवरून जाहीर मतभेदही चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ म्हणून चालवत होता फेसबुक
मुख्यमंत्र्यांचे सुपुक्ष खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर थेट राजीनाम्याचं विधानही केलं. या दरम्यान ज्या विधानसभा अध्यक्षांकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. त्यांनी अद्याप दिल्ली भेटीगाठी तर केल्या, पण अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी आणखी वाढलेली दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वारीत फडणवीसांच्या नावाच्या टोप्या, “वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा”, राष्ट्रवादीचा इशारा
हेही वाचा…” त्यामुळेच राऊतांकडून नितेश राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा, राणे-राऊत वाद हायकोर्टात पोहचला”
हेही वाचा…“शरद पवार प्रत्येक वेळी सांगतात, पण मोदीजीच निवडून येतात”, फडणवीसांचा टोला
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य