पटना : बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. लोजपाचे(LJP) चे ५ खासदार अचानक फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात पुढील रणनीती अंतर्गत काँग्रेसमध्ये फूट पाडून एनडीए मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जेडीयू (JDU) आणि भाजपा (BJP) दोघांनीही आपापल्या रणनीतीवर काम करण्यास सुरूवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अनेक नेते जेडीयूसोबत येण्याचे संकेत मिळत आहेत. जर हे असेच घडले तर बिहारमध्ये लोजपानंतर आणखी एक मोठा पक्ष फुटण्याच्या स्थितीत असेल. काँग्रेसचे अनेक नेते जेडीयू नेत्यांचसोबत चर्चा करत आहेत. केवळ संख्याबळाची वाट पाहत आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी जेडीयूचे नेते अनेक मिशनवर काम करत आहेत. मागील आठवड्यात काही नेत्यांसोबत जेडीयू नेत्याची बैठक झाली. काँग्रेसकडे सध्या विधानसभेत १९ आमदार आहेत. पक्षांत्तर बंदी कायद्यात न अडकण्यासाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि आमदारांना पक्षात घेण्यासाठी १३ आमदारांची गरज आहे. हा आकडा जुळवण्यासाठी अडचण येत आहे. परंतु १३ आमदारांची साथ मिळताच जेडीयू काँग्रेसला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.
अलीकडच्या दिवसात जीतन राम मांझी आणि मुकेश सहानी यांच्या विधानांमुळे NDA मध्ये वातावरण तापलं होतं. जीतन राम मांझी मागील काही दिवसांपासून समन्वयक समितीच्या बैठकीची मागणी करत भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत असल्याने NDA त खळबळ माजली आहे. मी नितीश कुमार यांच्यासोबत आहे असं जीतन राम मांझी म्हणत आहेत. तर दुसरीकडे मुकेश सहानी यांचे वक्तव्य आणि मांझी यांच्यासोबत भेटीनं एनडीएत सगळं काही ठीक आहे असं वाटत नाही. लालूप्रसाद यादव यांच्या वाढदिवशी मांझी तेजप्रताप यांच्या घरी पोहचले होते. तिथे त्यांनी लालू यांच्यासोबत फोनवरून १० मिनिटं संवाद साधला. त्यामुळे काँग्रेस फुटली तर सहकारी पक्षांवर अंकुश ठेवणं NDA ला सोयीस्कर जाणार आहे.
Read Also :
- ‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’
- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत, पोलिसांना तपासाचे आदेश
- कंत्राटदाराला घातली कचऱ्याने आंघोळ, संतप्त शिवसेना आमदाराचे प्रताप
- अभय बंग महान सामाजिक नेते, त्यांच्यामुळेच राज्य व्यसनमुक्त झाले; वडेट्टीवारांचा टोमणा
- राजकारण नव्हे; शिवसेनेची विचारधाराच चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर