मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांनी मंंत्रालयाबाहेर आंदोलन करत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी केली. तर मंत्रालयाच्या परिसरात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची गाडी आडवत विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. यावेळी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
हेही वाचा…“एका ताटात जेवलोय, भाजपपासून सांभाळून रहा,” सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सर्वांगाने चर्चा होणं आवश्यक आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीने बोलवावं, यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. याचसोबत त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची देखील भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने विशेष अधिवेशन घ्यावे, यासाठी निवेदन दिले.
हेही वाचा…“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी
दरम्यान, त्यासाठी सकाळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्याच विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, या मागणीसाठी विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. राज्यात मराठा समाजात निर्माण झालेल्या उद्रेकाची दखल घेऊन अध्यक्षांनी ही मागणी मान्य करावी आणि तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं ही विनंती देखील त्यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“आपल्या भावाचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढू नका”,सुळेंना चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा मंत्री हसन मुश्रीफांना दणका, मुंबईत तिघांनी गाडी फोडली
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय तरूणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं शिक्षणापासून दुर राहिल्याची खंत
हेही वाचा…“बोलविता धनी कोण ? भेटल्यावर सांगतो,” मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना झापलं