मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी याआधी धनगर समाजालाही फसवलं आहे. आमच्या घरासमोर येऊन पहिल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. परंतु धनगर समाजाला त्यांनी फसवलं आहे. एकनाथ शिंदे यांना देखील त्यांनी फसवलंय. त्यामुळे अजित पवार गटाला विनंती आहे की, कधी एका ताटात जेवलोय, भाजपपासून सांभाळून राहा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“आम्ही मनावर घेतलं तर यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू”, जरांगे पाटलांनी कुणाला दिला इशारा ?
सुप्रिया सुळे यांची कावेबाज माणुसकी प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. ज्या पद्धतीनं परिस्थिती चिघळवणारी वक्तव्य केलं जात आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांच्या खोटारड्या माणुसकीचा बुरखा टराटरा फाटला गेला आहे. सुप्रिया सुळे आपल्या भावाचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढू नका. त्याचा काहीही फायदा होणार नाही. असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“तोपर्यंत कामगारांचा संप हा बेमुदत सुरूच राहिल,” एक्साईड इंडस्ट्रीज येथील कामगारांनी पुकारला संप
तसेच सुप्रिया सुळे यांचा चिडचिडेपणा का वाढला आहे. याचे कारण राज्यातील जनतेला पुरते ठाऊक आहे. कावीळ झालेल्यांना जसं सगळं पिवळं दिसतं. तशी सुप्रिया सुळे यांची स्थिती झाली आहे. सुळे यांना जळी-स्थळी देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. हा आजार बरा नव्हे. त्यामुळे लवकर उपचार घ्या आणि बऱ्या व्हा. असा खोचक सल्ला चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.
राज्याच्या मोठ्ठ्या ताई…@supriya_sule
तुमची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे.
ज्या पद्धतीनं परिस्थिती चिघळवणारी वक्तव्यं करताय त्यावरून तुमच्या खोटारड्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटलाय
आणि हो, मोट्ठ्या ताई !
आपल्या भावाचा राग तुम्ही देवेंद्रजी यांच्यावर… pic.twitter.com/fu9MDZAgQP
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा मंत्री हसन मुश्रीफांना दणका, मुंबईत तिघांनी गाडी फोडली
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय तरूणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं शिक्षणापासून दुर राहिल्याची खंत
हेही वाचा…“बोलविता धनी कोण ? भेटल्यावर सांगतो,” मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना झापलं
हेही वाचा…“एका ताटात जेवलोय, भाजपपासून सांभाळून रहा,” सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा
हेही वाचा…“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी