हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील आत्महत्यांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. यातच आता हिंगोलीतील नहाद गावामध्ये २१ वर्षीय तरूणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नहाद गावातील रहिवासी असलेल्या गोविंद कावळे या तरूणाने चिठ्ठी लिहत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी मंजूर केला ठराव , मुख्यमंत्र्यांनीही केलं मोठं आवाहन
२१ वर्षीय गोविंद कावळे याने गावाजळव असलेल्या विहिरीत उडी घेत त्याने आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद कावळे याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत मी माझ्या शिक्षणापासून दुर राहिलो आहे. तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. असं म्हटलं आहे. सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.
हेही वाचा…“सर्वच समाजाला फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, राजीनामा द्या,” सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
दरम्यान, गेल्या १३ दिवसात २५ आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. काल एका दिवसात आठ आत्महत्या झाल्या आहेत. सरकारला आणखी किती बळी हवे आहे. असा संतापजनक सवाल राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर मित्रांनो आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र पाहिजे. आत्महत्या करून ताकद करून ताकद कमी होईल. घरच्यांचा, आईवडिलांचा, विचार करा, टोकाची भूमिका घेऊ नका. असं आवाहन देखील आव्हाडांनी केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“बोलविता धनी कोण ? भेटल्यावर सांगतो,” मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना झापलं
हेही वाचा…“एका ताटात जेवलोय, भाजपपासून सांभाळून रहा,” सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा
हेही वाचा…“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी
हेही वाचा…“आम्ही मनावर घेतलं तर यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू”, जरांगे पाटलांनी कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा…“तोपर्यंत कामगारांचा संप हा बेमुदत सुरूच राहिल,” एक्साईड इंडस्ट्रीज येथील कामगारांनी पुकारला संप