जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता दिवसेंदिवस गाजत चालला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी आज सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची अंबड मध्ये एल्गार सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केलंय.
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांना मनोज जरांगेना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार ? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.
हेही वाचा…“न्याय मिळाला नाही तर पिवळ्या झेंड्याला सलाम करून..,” विजय वडेट्टीवारांनी दिला कडक इशारा
दरम्यान, अंबड येथील एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टिका केली आहे. त्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण माजी खासदार संभाजी राजे यांनी छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचं मुख्य कामांकडे दुर्लक्ष,” आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राडा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“भुजबळांचं वय झालंय, पण आपला दर्जा घसरू देणार नाही,” जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार”, आरक्षणासाठी वडेट्टीवारांनी घेतला प्रण
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल