मुंबई : काल निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला बहाल केले आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि धनुष्यबाण गेल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहेत. त्यामुळे एका बाजूला आनंद साजरा केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी या प्रकरणावरून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांबाबत आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्यात आला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. यातच शिवसेनेची सध्याची घटना लोकशाही विरोधी असल्याचं निरीक्षण नोंदवत धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा..“भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले”, राष्ट्रवादीची टिकात्मक पोस्ट
काल निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे प्रकरणावरून अजित पवारांना डिवचलं आहे. घमेंड आणि अहंकार माणसाची कशी वाट लावू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. अजित पवार पुढचा नंबर तुमचा असू शकतो. घमेंड उतरवायचा सीजन चालू आहे. असं म्हणत नितेश राणे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा..‘मास्टर ब्लास्टर’ आमदार सुनील शेळके चिंचवडमध्ये ठरणार ‘किंगमेकर’
दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केला जात आहे. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित असून मागील सहा महिने न्यायालयात लढाई सुरु होती, तो पर्यंत निवडणुक आयोगाने निकाल देऊ नये असे बोललो होतो. निवडणुक आयोगाबाबत सांगेल जशी न्यायधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणुक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी. जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. निवडणुका घेण्याचे आव्हान मी केले. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर आता मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जास्त आहे. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती असून शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
घमेंड आणि अहंकार माणसाची कशी वाट लावू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे,
अजित पवार पुढचा नंबर तुमचा असू शकतो, घमेंड उतरवायचा सीजन चालू आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 18, 2023
Read also
- हेही वाचा…“शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका,” उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
- हेही वाचा..““विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठाम”, रविंद्र चव्हाण यांनी घेतली मनसेच्या नेत्यांची भेट
- हेही वाचा..‘शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच, राजकीय गणितं बदलली, 2024 ला शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी?
- हेही वाचा..“शिवसेना अन् धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
- हेही वाचा..‘“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील