मुंबई : कर्नाटक विजयानंतर महाविकास आघाडीला मोठं बळ मिळालं आहे. तसेच शिवसेना फुटीप्रकरण राज्यातील जनता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यातच आता आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आता इतर पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने भाजप-शिवसेना युतीत नवा भिडू सामिल होणार का ? अशी चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा…“२४ तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा..”, आमदाराने महावितरण अधिकाऱ्यांना झाप-झाप झापलं
राज ठाकरेंच्या भेटीवर फडणवीसांनी वैयक्तिक भेट असल्याचं सांगून काही गोष्टी बोलण्याच्या टाळल्या, असल्या तरी आगामी निवडणुकांसाठी भाजपकडून अशा पद्धतीचं प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेस मधून निलंबित आशिष देशमुखांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आता मित्रपक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
हेही वाचा…“केवळ एक रूपयात पीक विमा..!” शिंदे सरकारची नवी योजना, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
दरम्यान, महाविकास आघाडीला आगामी निवडणुकांमध्ये टक्कर द्यायची असेल तर मित्र पक्षांना जवळ घेतले पाहिजे. असे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या महायुतीत आता मनसे हा नवा भिडू भेटणार का ? अशी चर्चाही रंगू लागल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला..! डिजिटल मिडियाबाबत ऐतिहासिक निर्णय
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने ठेवले ‘या’ मतदारसंघावर लक्ष, शरद पवारांनी दिले महत्वाचे आदेश
हेही वाचा…निळूफुलेंची मुलगी गार्गी फुले म्हणतेय, की “राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मला तिकीट दिलं तर..”,
हेही वाचा…“महाराष्ट्रात कर्नाटक नाही तर फक्त ‘उद्धव ठाकरें’चाच फॉर्म्युला दिसणार”, ठाकरेंचे सैनिक मैदानात
हेही वाचा…भाजपच्या २८ वर्षाच्या बाल्लेकिल्याला सुरूंग लावणारा आमदार म्हणतोय, “मी अजून छोटा कार्यकर्ता”, पटोलेंची ‘ती’ ऑफर धुडकावली