मुंबई : कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही. याठिकाणी फक्त उद्धव ठाकरेंचाचा फॉर्म्युला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आगाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा होईल. पण कोणत्याही परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील.. या निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकत शिवशाहीची राजवट येईल. असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“..तर छगन भुजबळांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,” प्रकाश आंबेडकर आक्रमक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला अभुतपुर्व यश मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोरदार प्रचारानंतरही भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. तर काॅंग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यानंतर राज्यात देखील कर्नाटक फॉर्म्युला अमंलात येईल. असा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुर लावण्यात येत आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील ते १३ खासदार ही अपात्र होणार, सेनेच्या खासदाराचा मोठा दावा
दरम्यान, आम्ही १९ जागांच्या भूमिकेवर ठाम आहोत. मान्य आहे आमचे लोक सोडून गेले. परंतु सध्याच्या लोकसभेत आमचे १९ खासदार आहेत. महाराष्ट्र विजयी झालेले १८ आणि एक दादरा नगर हवेलीतील एक असे मिळून आमचे १९ खासदार आहेत. प्रत्येक पक्षाचा एक विजयी आकडा असतो तो आकडा कायम ठेवण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. आम्ही पुन्हा १९ खासदार निवडून आणू ही भूमिका एखाद्या पक्षाने घेतली तर त्यात काय चुकलं असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या २८ वर्षाच्या बाल्लेकिल्याला सुरूंग लावणारा आमदार म्हणतोय, “मी अजून छोटा कार्यकर्ता”, पटोलेंची ‘ती’ ऑफर धुडकावली
हेही वाचा…“२४ तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा..”, आमदाराने महावितरण अधिकाऱ्यांना झाप-झाप झापलं
हेही वाचा…“केवळ एक रूपयात पीक विमा..!” शिंदे सरकारची नवी योजना, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेतील ‘विरोधी पक्षनेते’ पद जाणार, शिंदे गट अॅक्शन मोडवर
हेही वाचा…निळुफुलेंची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले राष्ट्रवादीत, प्रवेश करताच राष्ट्रवादीने दिली ‘ही’ जबाबदारी