पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदन दिल्ली येथे सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र यावेळी महाराष्ट्र सदन येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हलवण्यात आले. यावरून राज्यातील राजकीय नेत्यांनी राज्य सरकारवर जहरी टिका केली. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ‘काॅंग्रेस’चा उमेदवार ठरला..! पटोलेंनी ‘नाव’ही जाहीर केलं
राष्ट्रपतीपदावर असलेल्या द्रौपदी मुर्म यांना हे लोक डावलू शकतात. तर तिथे आहिल्याबाई होळकर किंवा सावित्रीबाई फुले यांच्यासारखी हयात नसलेली माणसं या आरएसएस भाजपच्या खिजगणतीतच नाहीत. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. कारण छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते म्हणवून घेतात. कारण महाराष्टर सदनात जे घडलं तो ओबीसींबाच अपमान आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मिंधे गटाच्या ४० कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराड्यात”, ठाकरे गटाची जहरी टिका
“तुम्हाला जनतेची कामं करायची असतील तर सत्तेत राहूनच लढा द्यावा लागेल. तरच तुम्ही समाजासाठी अधिक प्रभावी पद्धतीने काम करू शकता.” ….. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे तर प्रकाश आंबेडकर साहेब, खुद्द बाबासाहेबांनी सांगितलेला हा विचार आपल्याला कसा विसरता येईल! सध्याच्या राज्यकर्त्यांना राजीनामा, बहिष्कार अशा गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. त्यामुळे त्यांच्याशी लढायचंच असेल तर आपल्याला आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा, पदाचा अधिक ताकदीने वापर करून लढा द्यावा लागेल. मला विश्वास आहे की बाबासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून या लढाईत तुम्ही देखील आम्हाला खंबीर साथ द्याल ! असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
“तुम्हाला जनतेची कामं करायची असतील तर सत्तेत राहूनच लढा द्यावा लागेल. तरच तुम्ही समाजासाठी अधिक प्रभावी पद्धतीने काम करू शकता.” ….. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रकाश आंबेडकर साहेब, खुद्द बाबासाहेबांनी सांगितलेला हा विचार आपल्याला कसा विसरता येईल! सध्याच्या राज्यकर्त्यांना… https://t.co/J8RqTrscFO
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) May 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटातील ते १३ खासदार ही अपात्र होणार, सेनेच्या खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“आघाडीसह आता शिंदे-फडणवीसांच्या ‘महायुती’ तही जागा वाटपावरून हमरीतुमरी, एक पक्ष आक्रमक
हेही वाचा…“चंद्रपुरचा कायापालट करण्याची धानोरकरांची भूमिका, मात्र नियतीच्या पुढे..”, अजित पवारांनी व्यक्त केलं दु:ख
हेही वाचा…ठाकरे गट पुन्हा फुटणार ? फडणवीसांचा मोठा दावा, अनेक जण संपर्कात
हेही वाचा…पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले 6आमदार तर ३ खासदार, जाण्याची वयं चिंतेत टाकणारी, वाचा संपुर्ण यादी..