मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. आता हा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा. अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यातच शिंदेंसोबत गेलेले खासदार देखील अपात्र होतील. असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे याची चर्चा आता रंगली आहे.
हेही वाचा…“मिंधे गटाच्या ४० कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराड्यात”, ठाकरे गटाची जहरी टिका
शिवसेनेतून आमदारांसह खासदार सोडून गेले आहेत. त्यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे. अन् पुढच्या निवडणुकीत आम्ही १९ खासदार निवडून आणू. या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता गजानन किर्तीकरांनी सांगितलं आहे की, आम्हाला नीट वागणूक मिळत नाही. सावत्रपणाची वागणूक मिळते. मग शिवसेना सोडतांना ह्याच खासदार आमदारांनी पाडा राष्ट्रवादी- काॅंग्रेससोबत वाचून दाखविला. आता तोच भाजपसोबत सुरू आहे. त्यामुळे आता तुम्ही कोणत्या पक्षात जाणार? असा सवाल करीत त्यांना पक्षांतर्गाची चटक लागली आहे. अशी टिकाही संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राने युवा खासदार गमावला..। काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधनं
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं, त्यावेळी शिवसेनेचे ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनेच्या १३ आमदारांनी देखील एकनाथ शिंदे यांची सोबत केली. यातच आता १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अजून विधानसभा अध्यक्षांकडे राखून ठेवण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आघाडीसह आता शिंदे-फडणवीसांच्या ‘महायुती’ तही जागा वाटपावरून हमरीतुमरी, एक पक्ष आक्रमक
हेही वाचा…“चंद्रपुरचा कायापालट करण्याची धानोरकरांची भूमिका, मात्र नियतीच्या पुढे..”, अजित पवारांनी व्यक्त केलं दु:ख
हेही वाचा…ठाकरे गट पुन्हा फुटणार ? फडणवीसांचा मोठा दावा, अनेक जण संपर्कात
हेही वाचा…पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले 6आमदार तर ३ खासदार, जाण्याची वयं चिंतेत टाकणारी, वाचा संपुर्ण यादी..
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ‘काॅंग्रेस’चा उमेदवार ठरला..! पटोलेंनी ‘नाव’ही जाहीर केलं