नवी दिल्ली : राज्यातील ४८ खासदारापैकी काॅंग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपुरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर नागपुरातील अरिहंत या खासजी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अचानक तब्येत आणखी बिघडल्याने त्यांच्यावर आता दिल्लीला हलवण्यात आले. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळू धानोरकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सावरकरांच्या जयंतीचा विसर, भाजपने दोन फोटो ट्विट करत साधला निशाणा”
२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी धानोरकरांची भेट झाली होती. धानोरकर शिवसेनेत असताना ती जागा भाजपला गेली. त्यामुळे राष्ट्रवादीकडून खासदारकीचे तिकीट मिळण्याची मागणी त्यांनी केली होती. अशी आठवणही अजित पवारांनी यावेळी सांगितली.
हेही वाचा…गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, काॅंग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. परंतु धानोरकर आणि आघाडीचा प्रयत्नांमुळे काॅंग्रेसची एक जागा निवडून आली. धानोरकर यांनी काॅंग्रेस पक्षातून हा विजय मिळवला. चंद्रपुरचा कायापालट करण्याची त्यांची भूमिका होती. मात्र नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे चंद्रपुर जिल्ह्यात कार्यालय नाही हे त्यांनी ऐकले होते. त्यावेळी धानोरकरांनी त्यांचे कार्यालय वापरण्याची संधी देऊन त्यांच्या दिलदारपणा दाखवला. असंही अजित पवारांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गट पुन्हा फुटणार ? फडणवीसांचा मोठा दावा, अनेक जण संपर्कात
हेही वाचा…पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले 6आमदार तर ३ खासदार, जाण्याची वयं चिंतेत टाकणारी, वाचा संपुर्ण यादी..
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ‘काॅंग्रेस’चा उमेदवार ठरला..! पटोलेंनी ‘नाव’ही जाहीर केलं
हेही वाचा…“मिंधे गटाच्या ४० कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराड्यात”, ठाकरे गटाची जहरी टिका
हेही वाचा…महाराष्ट्राने युवा खासदार गमावला..। काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधनं