मुंबई : काल देशभरात वीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. दिल्लीतील महाराष्ट्र भवनात राज्य सरकारच्या वतीने जंयतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमासाठी सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे इतरत्र हलवण्यात आल्याने मोठा वाद उफळून आला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा…नवनीत राणांसाठी कठीण परिक्षा..! राष्ट्रवादी, प्रहारनंतर आता अमरावतीच्या जागेवर काॅंग्रेसचा दावा
काल वीर सावकरांच्या जयंतीनिमित्ताने समाज माध्यमांवर सगळ्या राजकीय नेत्यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. यातच बीजेपी महाराष्ट्राने याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यात उद्धव ठाकरे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या फोटोला अभिवादन करतांना दिसत आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, काॅंग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची लाचारी. गांधी परिवारांची जयंती करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावकरांच्या जयंतीचा पडला विसर अस म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
हेही वाचा…आघाडीत बिघाडी..? लोकसभेच्या सर्व जागांची काॅंग्रेसकडून चाचपणी, काॅंग्रेस निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का ? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
कॉंग्रेसला खुश करण्यासाठी @OfficeofUT यांची लाचारी !!
गांधी परिवारांची जयंती साजरी करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा पडला विसर ! pic.twitter.com/IwYByZt4Bd
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) May 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे मध्यप्रदेशात काॅंग्रेस १५० जागा जिंकणार,” राहुल गांधींचा विश्वास
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट: वाढदिनी विलास लांडे यांनी फुंकले शिरुर लोकसभेचे रणशिंग! दिल्लीत धडकणार आता ‘स्वयंभू स्वावलंबी अन् स्वाभिमानी नेता’
हेही वाचा…“सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल”, परबांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा
हेही वाचा…मोठी बातमी..! काॅंग्रेसचा एकमेव खासदार व्हेटिंलेटरवर, रूग्णालयातून आली मोठी अपडेट