मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना साई रिसोर्ट प्रकरणी मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे कोर्टाने हे प्रकरण डिसमिस केल्याचं अनिल परब यांनी म्हटले आहे. त्यावर आता अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“कसेल त्याची जमिन याप्रमाणे.. जो जिंकेल त्याची पुणे लोकसभेची जागा”, आघाडीत बिनसलं
दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी आमची चौकशी केली. गेले दीड वर्षे याप्रकरणात माझी नाहक बदनामी करण्यात आली. याबाबत मी माझ्या बदनामीचा खटला हायकोर्टात दाखल केला आहे. सुरूवातीपासून या प्रकरणात काही तथ्य नसल्याचं सांगत आलो आहे. परंतु नेहमीप्रमाणे सोमय्या माझ्यावर खोटे आरोप करीत राहिले. त्यामुळे आता त्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल, किंवा १०० कोटींचा दावा केलाय ते १०० कोटी द्यावे लागेल असं अनिल परब यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…हद्दच झाली..! सावकरांच्या जयंतीसाठी ‘महापुरूषांचे पुतळे’ हटविले, सगळीकडून निषेधेचा पूर
पुढे बोलतांना ते म्हणाले की, काही प्रकरणे अंगलट येत असल्याचं समजताच सोमय्या पळ काढतात. हरीत लवादात हे प्रकरण सुनावणीला आलं तेव्हा हा प्रकरणात काही तथ्य नाही. आम्ही हे प्रकरण डिसमिस करत आहोत असं जेव्हा न्यायमूर्तींनी सांगितलं तेव्हा आपली अबुू जाईल या भितीने किरीट सोमय्या यांनी ही याचिका मागे घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! काॅंग्रेसचा एकमेव खासदार व्हेटिंलेटरवर, रूग्णालयातून आली मोठी अपडेट
हेही वाचा…नवनीत राणांसाठी कठीण परिक्षा..! राष्ट्रवादी, प्रहारनंतर आता अमरावतीच्या जागेवर काॅंग्रेसचा दावा
हेही वाचा…आघाडीत बिघाडी..? लोकसभेच्या सर्व जागांची काॅंग्रेसकडून चाचपणी, काॅंग्रेस निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यासमोरच पुतळे हटवले जातात हे चिंतेची बाब”, जयंत पाटलांची टिका
हेही वाचा…वडिलांचं अंत्यसंस्कार ही करू शकले नाही, काॅंग्रेसचे एकमेव खासदाराची प्रकृती खालवली, तात्काळ दिल्लीला हलवले