मुंबई : काल देशभरात वीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. दिल्लीतील महाराष्ट्र भवनात राज्य सरकारच्या वतीने जंयतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमासाठी सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे इतरत्र हलवण्यात आल्याने मोठा वाद उफळून आला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.
हेही वाचा…बच्चू कडूंनी अमरावतीवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा ही सांगितला, कडू सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का ? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
हेही वाचा…“कॅबिनेट मंत्रीपदासाठी पडळकर-राणेंमध्ये स्पर्धा, विरोधकांवर टिका करा अन् मंत्रीपद मिळवा”
दरम्यान, या घटनेचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे. आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे. या घडलेल्या प्रकाराची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. अस रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 28, 2023
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत… pic.twitter.com/da8J6VGGpr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पटोले ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून पायउतार होणार, कॉंग्रेसचा पुढचा ‘प्रदेशाध्यक्ष’ ठरला, थोरातही जाणार, कॉंग्रेसमध्ये वेगाने हालचाली सुरू
हेही वाचा…“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल
हेही वाचा…“संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात”
हेही वाचा…“मोदींनी संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“आताही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत करू,” केंद्रीय मंत्र्यांची ठाकरेंना ऑफर