मुंबई : काल देशभरात वीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. दिल्लीतील महाराष्ट्र भवनात राज्य सरकारच्या वतीने जंयतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमासाठी सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे इतरत्र हलवण्यात आल्याने मोठा वाद उफळून आला आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा…“संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात”
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्तृत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाहीत, ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला कळले, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“मोदींनी संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि वीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला. सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नयेत एवढा द्वेष का? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.
हेही वाचा…“आताही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत करू,” केंद्रीय मंत्र्यांची ठाकरेंना ऑफर
या दोन कर्तबगार महिलांनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत… pic.twitter.com/da8J6VGGpr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…वडिलांचं अंत्यसंस्कार ही करू शकले नाही, काॅंग्रेसचे एकमेव खासदाराची प्रकृती खालवली, तात्काळ दिल्लीला हलवले
हेही वाचा…“कसेल त्याची जमिन याप्रमाणे.. जो जिंकेल त्याची पुणे लोकसभेची जागा”, आघाडीत बिनसलं
हेही वाचा…हद्दच झाली..! सावकरांच्या जयंतीसाठी ‘महापुरूषांचे पुतळे’ हटविले, सगळीकडून निषेधेचा पूर
हेही वाचा…पटोले ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून पायउतार होणार, कॉंग्रेसचा पुढचा ‘प्रदेशाध्यक्ष’ ठरला, थोरातही जाणार, कॉंग्रेसमध्ये वेगाने हालचाली सुरू
हेही वाचा…“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल