अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मतदारसंघावरून दावे-प्रतिदावे केले जात आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे. तर अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील या जागेवर लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुढची लोकसभा निवडणुक नवनीत राणांसाठी मोठी कसरतीची ठरणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा…पटोले ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून पायउतार होणार, कॉंग्रेसचा पुढचा ‘प्रदेशाध्यक्ष’ ठरला, थोरातही जाणार, कॉंग्रेसमध्ये वेगाने हालचाली सुरू
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या जागेसाठी निवडणुक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आदेश दिला तर अमरावती लोकसभेची जागा लढविणार असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. तर आता अमरावती लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीच्या वाटेला आहे. मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेसला सुटला पाहिजे हा आमचा अट्टाहास आहे असं काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल
दरम्यान, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील या जागेसाठी दावा ठोकला आहे. कोणी, कुणालाही उमेदवारी द्यावी. पण आमच्या प्रहार संघटनेचा उमेदवार आम्ही याठिकाणी उभा करणार. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नवनीत राणांसाठी आता कठीण परिक्षा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आघाडीत बिघाडी..? लोकसभेच्या सर्व जागांची काॅंग्रेसकडून चाचपणी, काॅंग्रेस निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यासमोरच पुतळे हटवले जातात हे चिंतेची बाब”, जयंत पाटलांची टिका
हेही वाचा…वडिलांचं अंत्यसंस्कार ही करू शकले नाही, काॅंग्रेसचे एकमेव खासदाराची प्रकृती खालवली, तात्काळ दिल्लीला हलवले
हेही वाचा…“कसेल त्याची जमिन याप्रमाणे.. जो जिंकेल त्याची पुणे लोकसभेची जागा”, आघाडीत बिनसलं
हेही वाचा…हद्दच झाली..! सावकरांच्या जयंतीसाठी ‘महापुरूषांचे पुतळे’ हटविले, सगळीकडून निषेधेचा पूर