मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू करून दिली आहे. लोकसभा जागावाटपावरून महाविकास आघाडीत थोडी धुसफुस सुरू आहे. यातच आता कर्नाटकच्या विजयानंतर काॅंग्रेसला मोठी ताकद मिळाली आहे. यातच आता काॅंग्रेसने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघात चाचपणी सुरू करून दिली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसची मुंबईत महत्वाची बैठक २ जून ते ३ जून रोजी होणार आहे. या बैठकीसाठी राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत लोकसभेतील प्रत्येक संघात कुणाची ताकद? याबाबत रिपोर्ट कार्ड मागवण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्या मतदारसंघात प्रबळ उमेदवारांची चाचपाणीही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात”
दरम्यान, कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीने आगामी लोकसभा एकत्रित लढवणार असल्याचे संकेत दिलेत. परंतु लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून सध्या महाविकास आघाडीत आलबेल दिसत नाही. तसेच कर्नाटक विजयानंतर काॅंग्रेसला बळ प्राप्त झालं आहे. त्यामुळे काॅंग्रेस आगामी लोकसभा स्वबळावर लढणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यासमोरच पुतळे हटवले जातात हे चिंतेची बाब”, जयंत पाटलांची टिका
हेही वाचा…वडिलांचं अंत्यसंस्कार ही करू शकले नाही, काॅंग्रेसचे एकमेव खासदाराची प्रकृती खालवली, तात्काळ दिल्लीला हलवले
हेही वाचा…“कसेल त्याची जमिन याप्रमाणे.. जो जिंकेल त्याची पुणे लोकसभेची जागा”, आघाडीत बिनसलं
हेही वाचा…हद्दच झाली..! सावकरांच्या जयंतीसाठी ‘महापुरूषांचे पुतळे’ हटविले, सगळीकडून निषेधेचा पूर
हेही वाचा…पटोले ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून पायउतार होणार, कॉंग्रेसचा पुढचा ‘प्रदेशाध्यक्ष’ ठरला, थोरातही जाणार, कॉंग्रेसमध्ये वेगाने हालचाली सुरू