नवी दिल्ली : राज्यातील ४८ खासदारापैकी काॅंग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपुरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर नागपुरातील अरिहंत या खासजी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अचानक तब्येत आणखी बिघडल्याने त्यांच्यावर आता दिल्लीला हलवण्यात आले. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा…मोठी बातमी..! काॅंग्रेसचा एकमेव खासदार व्हेटिंलेटरवर, रूग्णालयातून आली मोठी अपडेट
वयाच्या ४७ व्या वर्षी बाळू धानोकर यांचं निधन झाल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याआधी आजारी असतांना त्यांच्या वडिलांच्या अत्यंसंस्कारलाही बाळू धानोरकर यांना जाता आलं नाही. मात्र पुत्र-पित्याचं असं अकाली निधन झाल्याने धानोरकर कुटूबियांना मोठा धक्का बसला आहे. आज सायंकाळी बाळू धानोरकर यांचं पार्थिव एअर अल्ब्युंलस ने दिल्लीहून वरोरा याठिकाणी आणण्यात येणार आहे. संध्याकाळी वरोरा येथे त्यांचं अंतिम संस्कार होणार आहे.
हेही वाचा…नवनीत राणांसाठी कठीण परिक्षा..! राष्ट्रवादी, प्रहारनंतर आता अमरावतीच्या जागेवर काॅंग्रेसचा दावा
शिवसैनिक ते काॅंग्रेस खासदार असा बाळू धानोरकर यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून त्यांनी २००९ साली शिवसेनेने त्यांना याच मतदारसंघातून तिकीट दिले. मात्र थोडया यशाने त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर २०१४ सालापर्यंत त्यांनी अनेक संघटनात्मक आंदोलने, पक्षाची बांधणी केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकी जिंकली. त्यांनतर त्यांनी आमदारकी सोडून काॅंग्रेसकडून खासदारकी लढविली अन् त्यात ते विजयीही झाले.
हेही वाचा…आघाडीत बिघाडी..? लोकसभेच्या सर्व जागांची काॅंग्रेसकडून चाचपणी, काॅंग्रेस निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत
दरम्यान, बाळू धानोरकर यांचं मुळ गाव चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास राहिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सावरकरांच्या जयंतीचा विसर, भाजपने दोन फोटो ट्विट करत साधला निशाणा”
हेही वाचा…गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे मध्यप्रदेशात काॅंग्रेस १५० जागा जिंकणार,” राहुल गांधींचा विश्वास
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट: वाढदिनी विलास लांडे यांनी फुंकले शिरुर लोकसभेचे रणशिंग! दिल्लीत धडकणार आता ‘स्वयंभू स्वावलंबी अन् स्वाभिमानी नेता’
हेही वाचा…“सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल”, परबांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा