मुंबई : महाराष्ट्र सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी याबाबत लवकरत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे आता शिंदे गटाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना इशारा दिला आहे.
हेही वाचा…ठाकरे गट पुन्हा फुटणार ? फडणवीसांचा मोठा दावा, अनेक जण संपर्कात
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले याचं प्रतोद पद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. यातच आता अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत , त्यांनी याबाबत ठोस पुरावे सादर करावे.. पुरावे आले तर त्याच्यावरतीही अॅक्शन करता येईल. असं भरत गोगावले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले 6आमदार तर ३ खासदार, जाण्याची वयं चिंतेत टाकणारी, वाचा संपुर्ण यादी..
त्याचसोबत भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावरही टिका केली आहे. संजय राऊत यांचा ज्योतिष कधी खरे ठरला आहे का. आता पर्यंत जेवढे त्यांनी सांगितलं आहे, ते सर्व खोटं ठरलं आहे. ते बोलतात त्याच्या उलट होतं आहे. त्याची काळजी करायची गरज नाही. आम्हाला भाजपमध्ये जाण्याची आवशक्यता भासणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निळुफुलेंची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले राष्ट्रवादीत, प्रवेश करताच राष्ट्रवादीने दिली ‘ही’ जबाबदारी
हेही वाचा…“..तर छगन भुजबळांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,” प्रकाश आंबेडकर आक्रमक
हेही वाचा…शिंदे गटातील ते १३ खासदार ही अपात्र होणार, सेनेच्या खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“आघाडीसह आता शिंदे-फडणवीसांच्या ‘महायुती’ तही जागा वाटपावरून हमरीतुमरी, एक पक्ष आक्रमक
हेही वाचा…“चंद्रपुरचा कायापालट करण्याची धानोरकरांची भूमिका, मात्र नियतीच्या पुढे..”, अजित पवारांनी व्यक्त केलं दु:ख