मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. शिवसेनेप्रमाणेच अजित पवारांनी देखील थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला. यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात ही भूमिका घेतली. त्यामुळे आता अजित पवारांमुळे आमच्यावरील गद्दारीचा शिक्का पुसला गेला आहे. तसेच आता त्यांच्यामुळे आम्हाला गद्दार म्हणून बोलण्याची हिमंत होणार नाही. याबद्दल अजित पवार यांचे आम्ही आभार मानतो. असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास होता, मुलाप्रमाणे वागवलं मग का? रोहित पवारांचा वळसे-पाटलांना सवाल
राष्ट्रवादीच्या विरोधात अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांना तुम्ही गद्दार म्हणणार का ? असा जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी असं काही मानत नाही. हा एक लोकशाहीचा भाग आहे. असल्या स्तरावर जाऊन राजकारण करणार नाही. जनतेमध्ये जाऊन निर्णय घेऊन. असं शरद पवारांनी म्हटलं असल्यचं उदय सामंत यांनी म्हटलं.
हेही वाचा…मनसे-ठाकरे युती ठरली..! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव घेऊन दोन्ही नेते दाखल
दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. परंतु अजित पवार सत्तेत आल्याने राज्य सरकारला बळकटी आली आहे. त्यांचं काम नेहमी इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे अजित पवारांमुळे आम्हाला कोणतीही अडचण नाही. असंही उदय सामंत म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्या!
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली
हेही वाचा…आता एकदम करेक्ट कार्यक्रम करणार, नाराज असलेल्या भाजप नेत्यांनी भूमिका बदलली
हेही वाचा…शरद पवारांकडून बडतर्फ, अजित पवार गटाने थेट ‘ह्या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षांची नियुक्ती
हेही वाचा…शिंदेंचे काही आमदार लवकरच ठाकरेंकडे परतणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या ट्विटने खळबळ