मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना ट्विट हॅक झाल्याने अनेक अफवा पसरवल्या गेल्या. तसेच ते ट्विट अकांऊट आपलं नव्हतं. अशी माहिती बोम्मई यांनी दिली आहे. यावर आता योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन बोम्मई यांनी दिलं आहे. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवाल केला आहे. मग इतके दिवस यावर का खुलासा केला नाही. असं ठाकरेंनी विचारलं आहे.
“महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य
गेली 15 ते 20 दिवस हा प्रश्न चिघळला जात आहे. मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅक झालं, तो शोध होईल. पण खुलासा होण्यास एवढे दिवस का लागले. बेळगावातील मराठी बांधवांवर पोलीस कारवाई आणि महाराष्ट्रातील वाहनांना प्रत्यक्ष बंदी झाली होती. मग जर ट्वीटर हॅग झालं होतं, तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे, की आपल्या ट्वीटवरून कोण काय बोलतं. तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना दोन्ही राज्यांनी काही करू नये , हा नवीन सल्ला नाही. असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
वाहतुक कोंडीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार, जोरदार आंदोलन करत प्रशासन, शासनाला घेतले धारेवर
तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला की, यापुर्वी दिला. विधानसभेत अधिवेशन आधीपासून सुरू आहे की नंतर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत केवळ महाराष्ट्राने थांबायचं का? या सर्व गोष्टींचा उहापोह नुसता पोहे खाऊन निघणार असेल तर काही अर्थ नाही. अशी टिकाही त्यांनी केली आहे.
Read also
- “पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
- “हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
- “ठाकरेंना हिंदू मतं मिळणार नाही, म्हणून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा अंधारेंचा प्रयत्न”; भाजपची टिका
- “त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक
- “सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा