मुंबई : साधुसंताबाबत वादग्रस्त वक्तव्य असलेले एक सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात जोरदार आंदोलने केलीत. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली. याच पार्श्वभूमीवर भाजपने सुषमा अंधारे आणि शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टिका केली आहे.
“संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ?” भाजपचा सवाल
सुषमा अंधारे या वारकरी संप्रदायाचा अपमान उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून करत आहेत. हिंदू समाजाची मते उद्धव ठाकरेंना मिळणार नाहीत. याची जाणीव त्यांना झालेली आहे. म्हणून हिंदू धर्माचा, वारकरी संप्रदायाचा अपमान करून, मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
“हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार, असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव”
तर ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळसे, अशी अखंड परंपरा असलेला महान वारकरी संप्रदाय हा जगाचा अभ्यासाचा विषय ठरला आहे आणि इथे महाराष्ट्रात कोणीतही कालपरवाच चर्चेत आलेल्या सुषमा अंधारे या वारकरी संप्रदायचा अपमान करतात वारकऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवतात? अशी नाराजी आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
“सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका
तसेच याप्रकरणावरून शेलारांना उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हा महाराष्ट्र द्रोह नाही का? असा सवाल करत आपली त्यांना मुकसंमती आहे का ? असा सवालही शेलारांनी केला. तसेच हिंदु देवदेवता आणि संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ? असा सवाल करत तुम्ही विठ्ठलाच्या पुजेला गेलात, आणि पदस्पर्शही केला नाहीत. त्याचाच हा पुढचा टप्पा आहे का ? असा सवालही शेलारांनी केला.
Read also
- “त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक
- “सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा
- “महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य
- वाहतुक कोंडीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार, जोरदार आंदोलन करत प्रशासन, शासनाला घेतले धारेवर
- “आमचा मोर्चा कोणतंही सरकार थांबवू शकणार नाही,” संजय राऊत असे का म्हणाले ?