मुंबई : महाविकास आघाडी सरकार असताना अनेक समित्या राज्यात काम करीत होत्या. पंरतु आता राज्यात असलेल्या समित्यामध्ये त्या क्षेत्रातील नावाजलेले लोकं काम करीत असतात. एकदा त्यांनी त्यासंदर्भात निर्णय घेतला तर त्यामध्ये राजकीय नेत्यांनी लुळबुळ तसेच नाक खुपसण्याची काहीच गरज नाही. असं मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले. कोबाड गांधी लिखित आणि अनघा लेले अनुवादित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला जाहीर झाला. पंरतु या पुस्तकात नक्षलवाद, हिंसेचं समर्थन केल्याचा आरोप करत हा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय सरकारच्या मराठी भाषा विभागाने घेतला. त्यासंदर्भात ते बोलत होते.
“आमचा मोर्चा कोणतंही सरकार थांबवू शकणार नाही,” संजय राऊत असे का म्हणाले ?
आमच्या सरकारच्या काळात अशी प्रकरणे झाली नाहीत. उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख या कोणाच्याही काळात अशा पुरस्कारात हस्तक्षेप झाल्याचं कधी पाहिलं नाही. त्यामुळे हे सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
“संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ?” भाजपचा सवाल
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक नक्षलवाद, हिंसेचं समर्थन करत असल्याचा ठपका आखिल भारतीय साहित्य परिषद संस्थेने ठेवलाय. मुळात या पुस्तकाचे मुळ लेखक हे माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य असून त्यांनी २००९ ते २०१९ या १० वर्षाच्या कारवासातून बाहेर आल्यावर हे पुस्तक लिहिले आहे. तसेच या संस्थेने कोबाड गांधींवर एकेकाळी त्यांचे नेपाळमधील माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचा आणि भारतीय माओवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधात महत्वाची भुमिका बजवल्याचा आरोप केलाय.
“हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार, असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव”
त्यावर भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष पदाचा राजीनामा देत लक्ष्मिकांत देशमुख यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय पुर्णपणे राजकीय आहे. एका विशिष्ट विचारधारेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून मी स्वत: हे पुस्तक वाचलं आहे. परंतु या पुस्तकात कुठेही नक्षलवादाचं उदात्तीकरणं करण्यात आलेलं नाही. उलट त्यावर टीका करण्यात आलीय.
Read also
- “ठाकरेंना हिंदू मतं मिळणार नाही, म्हणून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा अंधारेंचा प्रयत्न”; भाजपची टिका
- “त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक
- “सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा
- “महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य
- वाहतुक कोंडीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार, जोरदार आंदोलन करत प्रशासन, शासनाला घेतले धारेवर