पुणे : अलिकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारा फोन सिल्व्हर ओक या मुंबई येथील निवासस्थानी आला होता. हा फोन वारंवार आला असल्याने पोलीसांनी यावर तात्काळ अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अन् चौकशी करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वाहतुक कोंडीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार, जोरदार आंदोलन करत प्रशासन, शासनाला घेतले धारेवर
या प्रकरणात बिहाराहून पुण्यात स्थायिक झालेला सोनी नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. अटक कऱण्यात आलेला व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपी आपल्या बायको सोडून गेल्याने पवारांना फोन करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
“आमचा मोर्चा कोणतंही सरकार थांबवू शकणार नाही,” संजय राऊत असे का म्हणाले ?
आरोपी सोनी हा पुण्यात गेल्या 10 वर्षापासून राहत होता. यादरम्यान आरोपीच्या पत्नीने त्याला सोडून दुसऱ्या पुरूषाशी लग्न केल्याने त्याला ती सोडून गेली. यानंतर आरोपींनी या प्रकरणात शरद पवार यांना मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती. त्याचसाठी त्यांनी पवारांना फोन केला. मात्र यामध्ये समोरून काहीही प्रतिक्रिया येत नसल्याने आरोपी तणावात गेला अन् त्यांनी थेट धमकी दिली. अंस पोलिसांनी म्हटलंय.
“संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ?” भाजपचा सवाल
दरम्यान, ज्या दिवशी शरद पवारांना आरोपींनी धमकीचा फोन दिला. त्याच दिवशी त्याच्यावर पोलिसांनी भादंवि कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढील चौकशी पोलीस करीत आहे.
Read also
- “हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
- “ठाकरेंना हिंदू मतं मिळणार नाही, म्हणून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा अंधारेंचा प्रयत्न”; भाजपची टिका
- “त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक
- “सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा
- “महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य