सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता.
ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना जवळपास आठवडाभर जेलमध्ये जावे लागले. तब्येतीचे कारण देऊन त्यांना काही दिवसांसाठी कोल्हापूरला उपचाराला पाठवण्यात आले होते आणि याच दरम्यान त्यांचा जमीन मंजूर झाला. आमदार नितेश राणेंना जामीन झाल्यानंतर नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मी बोलायला लागल्यावर चांगल्या चांगल्याच बीपी हाय होईल असा इशारा देखील नितेश राणेंनी दिला होता.
नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
नितेश राणेंनी दिलेल्या या इशाऱ्याला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. वैभव नाईक यांनी राणे कुटुंबियांना इशारा देताना म्हटलं आहे की इथून पुढे सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही. नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला होता आणि तो सिद्ध होईल अथवा नाही, हा न्यायालयाचा निर्णय असेल. मात्र नितेश राणेंचा या हल्ल्यात सहभाग असल्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाचीही दहशत चालणार नाही, हे भाजपचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी लक्षात घ्यावे की असा कडक इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.
Read also:
- ” तू योद्धा महान है ” नितेश राणेंच्या मुंबईतील बॅनरने शिवसेनेला पुन्हा डिवचले
- जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देश, राज्याचा प्रथम विचार करणारे; आरएसएस डिसुझाच्या पाठीमागे ठामपणे उभा
- ‘पुढे चला मुंबई’; मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅगलाईन ठरली
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी