सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना जवळपास आठवडाभर जेलमध्ये जावे लागले. तब्येतीचे कारण देऊन त्यांना काही दिवसांसाठी कोल्हापूरला उपचाराला पाठवण्यात आले होते आणि याच दरम्यान त्यांचा जमीन मंजूर झाला.आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी लगेचच शिवसेनेला डिवचले आहे. नितेश राणेंना जामीन झाल्यानंतर राणे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात नितेश राणेंचे स्वागत केल्याचे पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर राणेंचे प्रमुख विरोधी शिवसेनेला डिवचण्यासाठी मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
मुंबईतील जुहू परिसरात राणे समर्थकांनी रात्री मुंबईच्या रस्त्यावर बॅनर लावले आहेत. नितेश राणे यांच्या समर्थनार्थ हा राणे ब्रँड आहे. अशा आशयाचे फलक लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही बॅनरवर शिवसेनेला डिवचण्यासाठी कविता देखील लिहण्यात आलेल्या आहेत. ” तू योद्धा महान है ” असं बॅनरवर लिहण्यात आलं आहे. हे बॅनर काहीसे वादग्रस्त असल्याने जुहू पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत बॅनर उतरवले आहे. आता शिवसैनिक राणेंच्या कार्यकर्त्यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read also:
- जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देश, राज्याचा प्रथम विचार करणारे; आरएसएस डिसुझाच्या पाठीमागे ठामपणे उभा
- ‘पुढे चला मुंबई’; मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅगलाईन ठरली
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
- नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला