पुणे : शिरूर लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सरळ लढत होती. मात्र वंचितकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिरूरची लढत तिरंगी झाली आहे. अशातच आता विजयाचा गुलाल उधळण्यासाठी शिरूरमध्ये प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. काल हडपसरमध्ये शिवसेनेच्या वतीने आढळरावांसाठी मेळावा पार पडला. या मेळाव्यातून आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टिका केली.
हेही वाचा…जळगावात भाजपचा खासदार ठाकरे गटाच्या गळाला, स्मिता वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यंतीचा विषय शिरूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. याही निवडणुकीत हा विषय गाजला जाऊ शकतो. याचाच धागा पकडत आढळराव पाटलांनी कोल्हेंची खरडपट्टी काढली. बैलगाडा बंदी उठवण्यासाठी मी स्वत: औरंगाबाद खंडपीठात याचिका केली. पुढे हायकोर्टात देखील स्वत : च्या पैशाने लढलो. ही बंदी उठवण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या केसेस देखील माझ्या अंगावर आहेत. आज जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बैलगाड्याशी काही संबंध नाही ते केवळ घोडीवर बसणारे आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षात कोणतेही काम केलं नाही, त्यांच्याकडे केवळ बोलण्याची कला असून गोड गोड बोलतात. एखादे विकासकाम करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखे सोपे नाही, असा घणाघात आढळराव पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा…“वर्ध्यातून एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू”, ‘आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं पवारांचं आवाहन’
पुढे आढळरावांनी नाशिक आणि पुणे हायवेच्या प्रश्वांवरूनही कोल्हेंवर टिका केली. पुणे नाशिक हायवेसाठी २००८ ते २०१३ तत्कालीन काँग्रेस सरकारसोबत भांडलो. त्यानंतर मंजुरी मिळाली तर नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात टेंडर निघाले. आज बोलणारे त्यावेळी राजकारण नव्हते, यामध्ये मी केलेला पाठपुरावा दाखवतो त्यांनी त्यांचे योगदान दाखवावे, असा टोला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुती उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे.
दरम्यान, शिरूरमध्ये वेगळा उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांपुढे नाराजी आहे. अनेक कार्यकर्त्यांना न आवडणारा उमेदवार आवडला नाहीय. यावर बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मला नवीन नाही. वळसे पाटील आणि आम्ही एकत्रच होतो. तिन्ही पक्ष एकत्र आल्याने विजय आमचाच होईल. असा विश्वास व्यक्त करत कांदा निर्यांत बंदी, पाण्याचा प्रश्न येत्या सहा महिन्यात मार्गी लावणार असं आश्वासन देखील त्यांनी दिले.
READ ALSO :
हेही वाचा…“विखे मनाने अगदीच भिकारी निघाले”, लंकेंवर टिका, शरद पवार गटाकडून सुजय विखेंचा समाचार
हेही वाचा…“हिंगोलीमध्ये महायुतीत धुसफूस, हेमंत पाटलांची उमेदवारी जाणार, शिंदे अन् भाजपच्या आमदारांमध्ये गुप्त बैठका
हेही वाचा…विकसित भारताचे स्वप्न होणार साकार, “कामगारांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी,” मुरलीधर मोहोळांचे आवाहन
हेही वाचा…“घड्याळाला मत म्हणजे, विकासाला मत”, यंदा अजितदादांच्या विचारांचा खासदार होणार,- सुनेत्रा पवार
हेही वाचा…शरद पवारांनी थेट उमेदवाराच्या मिरवणूक रथात बसण्याचा हट्ट केला अन्.. सगळ्यांची तारांबळ उडाली, एकच चर्चा