सिंधुदुर्ग : राजापुर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या यांच्या संशयास्पद मृत्यूवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्याआधीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शशिकांत वारिसे यांची भेट घेतली. या हत्याबाबत राज्यातील राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर कडाडून टिका केली आहे. यातच संजय राऊतांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..“दुसऱ्यांची घरे फोडून स्वत:ची इमारत बांधणारे वास्तुशिल्पी म्हणत भाजपने शरद पवारांना डिवचलं,” राष्ट्रवादीनेही दिलं प्रत्युत्तर
ऱिफायनरी होईल की नाही तो काळ ठरवेल, परंतु शंशिकांत वारिसे यांच्या हत्येचं काय झालं? ते महत्त्वाचं आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यावेळीही नाणार, रिफायनरी प्रकल्पावरून सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. शंशिकांत वारिसे यांची हत्या ही राजकीय आहे. तसेच सरकार बदलल्यानंतर आडवं कोण येतोय. अशा प्रकारे सरकारने छाती ठोकपणा सांगायला सुरूवात केली. मग आडावे येणाऱ्याचे खून करायचं का ? असा सवाल राऊतांनी केला आहे.
हेही वाचा…सत्तासंघर्षांची सुनावणी आता मंगळवारी, पाच की सात घटनापीठाकडे जाणार की, निकाल लागणार ?
तुरूंगात मला पाठवण्यात आलं. अन् तुरूंगातच मला मारण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. त्याविषयी लवकरच बोलणार आहे. तसेच तुम्हाला माणसे मारण्यासाठीच सत्तेवर आणलं आहे का ? असा सवालही राऊतांनी केला आहे. वारिसे यांनी तुमचं काय केलं होतं. त्याच्या आक्रोश मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावं. अशा प्रकारे महाराष्ट्रात चालणार नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- ‘भाजयुमो’चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर..! शहराध्यक्ष महेश लांडगे, युवा मोर्चाचे संकेत चोंधे यांचा पुढाकार
- हेही वाचा…चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार ?
- हेही वाचा..स्पर्श घोटाळ्यातील वादी-प्रतिवादी राष्ट्रवादीत; योगेश बहल यांची घुसमट!
- हेही वाचा..“ आव्हाडांच्या स्वीय साहाय्यकांसह चौघांना एकदिवसीय पोलीस कोठडी, मारहाण प्रकरण अंगलट
- हेही वाचा..“एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अन् शरद पवार पोटनिवडणुकीसाठी मैदानात”, पुण्यातील राजकारण तापणार