मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस शिंदे गट आणि ठाकरे गटातील वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू जोरदारपणे मांडली. हे प्रकरण सात पीठांकडे जावं अशी मागणी ठाकरे गटाकडून मागणी केली जात होती. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला. यासंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी अनेक घटनांचा संदर्भ दिला आहे. यातच हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. त्यातच आज न्यायमुर्तींनी ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे ही सुनावणी आता मंगळवारी होणार आहे.
हेही वाचा..““देवेंद्र फडणवीसांना कंड्या पिकवायला कसा वेळ मिळतो?”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना खोचक टोला
आज शिंदे गटाच्या वतीने वकिल महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देतांना यावेळी जेठमलानी यांनी आमदारांच्या जीवाला धोका होता असा दावा केला होता. त्यांनी याबाबत शिवराजसिंह चौहान यांच्या केसचा दाखल देण्यात आला. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी देखील यावर आक्षेप घेतला.
हेही वाचा..““आव्हाडांना मारण्याची धमकी, कार्यकर्त्यांची आयुक्तांना मारहाण, ऋुता आव्हाडांनी थेट गाठलं पोलीस स्टेशन”
जगातील कोणत्याही लोकशाहीत हे स्वीकारलं जाऊ शकत नाही. दहाव्या सुचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये. तुम्ही 34 असले तरी विलिनीकरण हाच पर्याय सिब्बल यांनी सुचवला. त्यांनी संविधानाच्या दहाव्या सुचीत बहुमताला महत्व असा काही नियम नाही. आमदार विलीन झाले तरी मुळ पक्ष तसाच राहतो. असं म्हणत त्यांनी राजस्थानमधील केसचाही दाखला दिला. त्याचबरोबर लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं. यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपला मतदान केलं. असंही कपिल सिब्बल यांनी केला.
हेही वाचा..“हेमंत रासनेंना आता व्यापारी संघटनांनीही दिला पाठिंबा, भेट घेत साधला संवाद”
दरम्यान, ठाकरे गटाच्या वकिलांनी यावेळी नबाम रेबिया केसचाही दाखला दिला. त्याचबरोबर त्यांनी किहोटो केसचाही याठिकाणी उल्लेख केला आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद पुर्ण न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे हे प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे जाणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Read also
- हेही वाचा..“थोडी ताकद लावा.. मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल;” खासदार गिरीश बापट
- हेही वाचा..“चिंचवडमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला…महाविकास आघाडी, अपक्षासह वंचितचेही तगडे आव्हान!
- हेही वाचा..“ऑक्सिजन सिलेंडरसह गिरीश बापट हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मैदानात, टिळक, जगतापांची कार्यकर्त्यांना आठवण
- हेही वाचा..वंचितचा राहुल कलाट्यांना पाठिंबा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, की “आता उद्धव ठाकरे…”
- हेही वाचा.अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, राहुल कलाट्यांना वंचितचा पाठिंबा