पुणे : पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टिका केली आहे.
हेही वाचा..“धंगेकरांच्या पोस्टवरून राष्ट्रवादी गायब, आघाडीत नेमकं काय चाललंय?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शाळेत काही विद्यार्थी असतात. ज्यांचे लक्ष सातत्याने खिडकीच्या बाहेर असते. पण अभ्यासात सहाही विषयात ते नापास होतात. अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांची झाली आहे. मला वाटते, त्यांची खिडकीतील जागा बदलून त्यांना वर्गात मध्यभागी बसवायला हवे. कारण शाळेत काही नॉटी मुले असतात. त्यांचे खिडकीतून बाहेर लक्ष जाऊ नये म्हणून शिक्षक त्यांची जागा बदलतात. फडणवीसांनाही असेच मध्यभागी बसवायला हवे. त्यामुळे त्यांना कामावर लक्ष केंद्रीय करता येईल. असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा..“भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत”, खासदार श्रीरंग बारणे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांसह सहा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आहे. अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे, असे असूनही कंड्या पिकवायला त्यांना वेळ कसा मिळतो? असा खोचक टोला करत उपमुख्यमंत्री पद असणे आणि सहा खाती सांभाळणे, हे खुप जबाबदारीचे काम आहे, असंही त्या म्हणाल्या.
Read also
- हेही वाचा..““आव्हाडांना मारण्याची धमकी, कार्यकर्त्यांची आयुक्तांना मारहाण, ऋुता आव्हाडांनी थेट गाठलं पोलीस स्टेशन”
- हेही वाचा..“हेमंत रासनेंना आता व्यापारी संघटनांनीही दिला पाठिंबा, भेट घेत साधला संवाद”
- हेही वाचा..“..तर भारताची सुधारणा अशक्य,” जंयत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा
- हेही वाचा..सलग तीन दिवस सत्तासंघर्षावरील सुनावणी पुर्ण, न्यायालयाने घेतला हा निर्णय
- हेही वाचा..“साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा? शुद्धीवर ये” पुण्यात राष्ट्रवादी अन् मनसेत जुंपली