मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस शिंदे गट आणि ठाकरे गटातील वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू जोरदारपणे मांडली. हे प्रकरण सात पीठांकडे जावं अशी मागणी ठाकरे गटाकडून मागणी केली जात होती. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला. यासंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी अनेक घटनांचा संदर्भ दिला आहे. यातच हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
हेही वाचा..“गुवाहाटीला जाण्यानं मंत्रालय झालं असेल तर अजून दोनदा गुवाहाटीला जाऊ”, बच्चू कडू
आज शिंदे गटाच्या वतीने वकिल महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देतांना यावेळी जेठमलानी यांनी आमदारांच्या जीवाला धोका होता असा दावा केला होता. त्यांनी याबाबत शिवराजसिंह चौहान यांच्या केसचा दाखल देण्यात आला. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी देखील यावर आक्षेप घेतला.
हेही वाचा..“पोटनिवडणुकांसाठी सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागलीय, विजय आमचाच”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
जगातील कोणत्याही लोकशाहीत हे स्वीकारलं जाऊ शकत नाही. दहाव्या सुचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये. तुम्ही 34 असले तरी विलिनीकरण हाच पर्याय सिब्बल यांनी सुचवला. त्यांनी संविधानाच्या दहाव्या सुचीत बहुमताला महत्व असा काही नियम नाही. आमदार विलीन झाले तरी मुळ पक्ष तसाच राहतो. असं म्हणत त्यांनी राजस्थानमधील केसचाही दाखला दिला. त्याचबरोबर लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं. यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपला मतदान केलं. असंही कपिल सिब्बल यांनी केला.
हेही वाचा..““पवार साहेबांनी धुर्त डाव टाकत राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी अजित पवारांना राजभवनावर पाठवलं”
दरम्यान, ठाकरे गटाच्या वकिलांनी यावेळी नबाम रेबिया केसचाही दाखला दिला. त्याचबरोबर त्यांनी किहोटो केसचाही याठिकाणी उल्लेख केला आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद पुर्ण न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे हे प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे जाणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Read also
- हेही वाचा..“साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा? शुद्धीवर ये” पुण्यात राष्ट्रवादी अन् मनसेत जुंपली
- हेही वाचा..“धंगेकरांच्या पोस्टवरून राष्ट्रवादी गायब, आघाडीत नेमकं काय चाललंय?
- हेही वाचा..“भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत”, खासदार श्रीरंग बारणे
- हेही वाचा..“जयंतीसारखे शब्द लावताना काळीज जड होते, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; लक्ष्मण जगतापांच्या जयंतीनिमित्त पत्नी अश्विनी जगताप यांच्या भावना
- हेही वाचा..““राष्ट्रीय समाज पक्षाची पुर्ण ताकद हेमंत रासनेंना देणार, विजयी गुलाल उधळणार”, महादेव जानकर