मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा सगळा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळेच ते याविषयावर निर्णय घेतली. पंरतु न्यायालयाच्या निकालावरून मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सध्या चित्र दिसत आहे. तसेच राज्यात चांगला कारभार सुरू असतांना नव्याने विस्तार करण्याची गरज सध्या नाहीय. अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..““तर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल”, ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला विश्वास
सध्या न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटाची राजकीय लढाई सुरू आहे. यात मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका ठाकरे गटाने दाखल केली आहे. त्यामुळे यावर जोपर्यंत निर्णय लागत नाही. तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. अशी शक्यता सध्या वाटू लागली आहे. यावरून सत्ताधारी पक्षावर सातत्याने विरोधक कडाडून टिका करतांना दिसत आहेत.
हेही वाचा..““भाजपचे पतन थांबवण्यासाठी मोदीला महिन्याला राज्यात येऊन पोळ्या लाटाव्या लागताहेत”
काही लोकं मंत्री झालेत. परंतु मी मंत्रालय सुरू केलं आहे. त्यामुळे मंत्रालय निर्माण महत्त्वाच आहे की मंत्री होणं, असा सवाल देखील कडू यांनी केला. तसेच या देशात गुवाहाटीला जाण्यानं मंत्रालय झालं असेल तर अजून दोनदा गुवाहाटीला जाऊ. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे. तसेच आम्ही खोके वाले नाहीतर मंत्रालयवाले आहोत. असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा..“पोटनिवडणुकांसाठी सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागलीय, विजय आमचाच”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
- हेही वाचा..““पवार साहेबांनी धुर्त डाव टाकत राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी अजित पवारांना राजभवनावर पाठवलं”
- हेही वाचा..“शहराच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण’ सदैव स्मरणात..! भाजप आमदार महेश लांडगे यांची भावना
- हेही वाचा.. ED सरकारने आमदारांची फौज गुवाहाटीला पळवली, त्याबदल्यात…;” सुप्रिया सुळेंचा शिंदेंना खोचक सवाल
- हेही वाचा..पोटनिवडणुकीची रंगत वाढली…! हेमंत रासनेंसाठी महायुतीच्या नेत्यांकडून खांद्याला खांदा लावून प्रचार