मुंबई : राज्यातील मागील काही वर्षापासून राजकीय वातावरण वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलचं चर्चेत आलं आहे. यातच पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची ख्याती जगभरात आहेत. परंतु आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सहावं ज्योतिर्लिंग आसाम मध्ये असल्याचा दावा केला आहे. तसेच आसामच्या पर्यटन विभागाने जाहीरात देखील काढली आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..““चार महिन्याआधी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं, आता पुन्हा भाजपमध्ये, त्या नेत्याची सर्वदुर चर्चा”
श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील भीमाशंकर पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरू केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे.
हेही वाचा..““फडणवीसांना जे बोलता येत नाही, ते बोलायला कोकणातील कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत?”
श्रीमद् आद्या शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही. आता आणखी कुणाची साक्ष हवी? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय ? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतित व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय. अशी टिकाही त्यांनी केली.
हेही वाचा..मोठी बातमी..! शिवजयंतीच्या आधी भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार?
दरम्यान, घटनाबाह्य ED सरकार आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही. असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी. असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..पोटनिवडणुकीची रंगत वाढली…! हेमंत रासनेंसाठी महायुतीच्या नेत्यांकडून खांद्याला खांदा लावून प्रचार
- हेही वाचा..““तर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल”, ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला विश्वास
- हेही वाचा..““भाजपचे पतन थांबवण्यासाठी मोदीला महिन्याला राज्यात येऊन पोळ्या लाटाव्या लागताहेत”
- हेही वाचा..““मनसेने रासनेंना पाठींबा दिल्यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले, मनसेच्या पाठींब्यामुळे रासने सेफ झोनमध्ये”
- हेही वाचा..“कसब्यात नियोजन व प्रचारात भाजपची आघाडी; भाजपचे मंत्री हेमंत रासनेंसाठी एकवटले