मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदापासून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. यातच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशात 13 नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यातच राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस हे 19 तारखेच्या आधी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“निवडणुकीत आपलाच विजय व्हावा,” हेमंत रासनेंसाठी भाजपची कोअर कमिठी अलर्टं मोडवर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भगतसिंह आणि राज्य सरकार असा वाद सुरू होता. त्यातच त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी कडाडून विरोध केला. तसेच महाराष्ट्रात गो बॅक कोश्यारी अशा घोषणा देत आंदोलने केलीत. यातच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांच्यावर प्रखरशब्दात टिका करण्यात आली. यातच आता 19 तारखेच्या आधी राज्यपाल महाराष्ट्रतून जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा..“शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी, बंडखोर आमदार भाजपमध्ये जाणार ?”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यहिताचे अनेक प्रश्न मांडले आणि त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदन प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आला आहे. यावेळी राज्यातील सर्व मंत्री हजर होते.
Read also
- हेही वाचा..“BBC ने डॉक्युमेंट्री काय बनवली, तर लगेच त्यांच्यामागे आयटी चा ससेमिरा”
- हेही वाचा..“..तर उद्या संपुर्ण देश खावून टाकेल”, उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टिका
- हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती,” त्यामुळे सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
- हेही वाचा..“शिंदे फडणवीस सरकारचं आजचं मरण उद्यावर जाऊ शकत, परंतु सरकारचा अंत अटळ”
- हेही वाचा..” पोटनिवडणुकांसाठी राजकारणातील भाजपचा चाणक्य पुण्यात येणार, विरोधकांमध्ये भरली धडकी”