मुंबई : दिल्लीतील बीबीसी कार्यालयावर आज आयटीने धाड टाकली आहे. मागील काही दिवसांपासून बीबीसी आणि केंद्र सरकार असा वाद सुरू झाला होता. त्यातच आज आयकर विभागाने दिल्लीच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राज्यातील राजकीय नेत्यांकडून कडाडून टिका करण्यात येत आहे. यातच शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर यावरून लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा..“शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी, बंडखोर आमदार भाजपमध्ये जाणार ?”
आपण लोकशाहीचे जे चार स्तंभ म्हणतो, त्यामध्ये न्यायव्यवस्था, प्रशासन, शासन यांच्यासह महत्त्वाचा स्तंभ म्हणजे माध्यम असतो. मी तुमच्याशी बोलत असतांना या बातमीसोबतच बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकराची लोक गेली आहे. ही सुद्धा बातमी सुरू असेल. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं? म्हणजेच काय. आम्ही वाटेल ते करू पण आवाज नाही उठायचा. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही जी पाशवीवृत्ती आपल्या देशात आज फोफावायला बघते आहे, ती आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या संपुर्ण देश खावून टाकेल. असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“तर तुम्ही रोज बदाम खा, पहाटेच्या शपथविधीवरून ट्विटवर रंगलं, राष्ट्रवादी अन् भाजप ट्विटवार”
बीबीसीवर केलेल्या कारवाईनंतर काॅंग्रेसने देखील मोदींवर टिका केली आहे. बीबीसीने डॉक्युमेंट्री काय बनवली तर लगेच त्यांच्यामागे आयटी चा ससेमिरा लावून दिला. ही अशी दडपशाही करून माध्यामांचा आवाज दाबता येईल असं जर मोदी सरकारला वाटत असेल तर हा निव्वळ मुर्खपणा आहे. लोकशाहीची कत्तल करून पाहणाऱ्यांना जनतेने वेळोवेळी सत्तेवरून पायउतार केले आहे, हे मोदींनी विसरू नये, असा इशाराही काॅंग्रेसने दिला आहे.
हेही वाचा..चिंचवडमध्ये मतविभाजनाची धास्ती, राहुल कलाटे भाजपची की आघाडीची मतं घेणार? जोरदार फिल्डिंग
दरम्यान, अलिकडेच बीबीसीने दाखवलेला इंडिया द मोदी क्वेश्चन हा माहिती पटाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. हा माहितीपट समाज माध्यमांवरून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. त्यावरून देखील विरोधकांनी मोदींवर कडाडून टिका केली होती. यातच आता बीबीसीच्याच कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकल्याने टिका केली जात आहे.
BBCने डॉक्युमेंट्री काय बनवली तर लगेच त्यांच्यामागे IT चा ससेमिरा लावून दिला. ही अशी दडपशाही करुन माध्यमांचा आवाज दाबता येईल असं जर मोदी सरकारला वाटत असेल तर हा निव्वळ मूर्खपणा आहे. लोकशाहीची कत्तल करु पाहणाऱ्यांना जनतेने वेळोवेळी सत्तेवरुन पायउतार केले आहे, हे मोदींनी विसरु नये. pic.twitter.com/Tss1SUgvi5
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 14, 2023
Read also
- हेही वाचा..“..तर उद्या संपुर्ण देश खावून टाकेल”, उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टिका
- हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती,” त्यामुळे सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
- हेही वाचा..“शिंदे फडणवीस सरकारचं आजचं मरण उद्यावर जाऊ शकत, परंतु सरकारचा अंत अटळ”
- हेही वाचा..” पोटनिवडणुकांसाठी राजकारणातील भाजपचा चाणक्य पुण्यात येणार, विरोधकांमध्ये भरली धडकी”
- हेही वाचा..“निवडणुकीत आपलाच विजय व्हावा,” हेमंत रासनेंसाठी भाजपची कोअर कमिठी अलर्टं मोडवर